
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत आमदार रोहित पवारांनी एक महत्त्वाचे आणि थेट विधान केले आहे. त्यांच्या मते, दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षाची साथ सोडल्यासचं हे विलिनीकरण शक्य आहे. दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना पवारांनी हे स्पष्ट केले.
या संदर्भात बोलताना रोहित पवारांनी पूर्वीच्या घटनांची आठवण करून दिली. त्यांनी नमूद केले की, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी एकत्र येऊन पक्षावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता, याचे पुरावे आपण पूर्वी दिले होते. मात्र, आता त्या जुन्या गोष्टी पुन्हा चर्चेत आणून फायदा होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पवारांच्या म्हणण्यानुसार, शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांच्या नेतृत्वाखालील गट हे कधीच एकत्र येऊ शकत नाहीत, जोपर्यंत अजित पवारांचा गट भाजपशी असलेले संबंध तोडत नाही. राज्याच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या घडामोडी आणि महायुतीच्या संदर्भात हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.
Leave a Reply