
Sanjay Raut News: गेल्या काही दिवसांपासून राज्यात हिंदु सण साजरे करण्यावरुन अनेक वाद सुरु आहेत. सण-उत्सावरुन राज्यात राजकीय पक्ष एकमेकांच्याविरोधात बाजू मांडताना दिसत आहेत. दहीहंडी आणि गणेशोत्सवातील डीजे बंदी हे प्रकरण गाजत असताना आता गरबा, दांडियावरुन वाद सुरु झाला आहे. नुकतेच भाजप नेत्याने नवरात्रीबद्दल एक मोठे विधान केले. मंत्री नितेश राणे यांनी थेट गरब्यामध्ये लव्ह जिहाद व्हायला नको म्हणून, मुस्लिमांना थेट प्रवेशच नको असे म्हटले. आता या वादात अमृता फडणवीस यांनी जे स्पष्टपणे आपले मत मांडले यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Leave a Reply