• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Rajabhau Waje | खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! राजाभाऊ वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं

August 12, 2026 by admin Leave a Comment


नाशिक शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था आणि खड्ड्यांच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा राजकारण तापले आहे. शहरातील खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा बळी गेल्याचा दावा करण्यात आला असून, काही नागरिक जखमी झाले आहेत. या परिस्थितीवरून महापालिका प्रशासन आणि सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. दरम्यान, महापालिका प्रशासनाने शहरातील पाच हजारांहून अधिक खड्डे बुजवल्याचा दावा केला आहे. मात्र, उद्धव ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी या कारवाईवरून पुन्हा सरकार आणि प्रशासनाला लक्ष्य केले आहे.

राजाभाऊ वाजे यांनी नाशिकच्या रस्त्यांच्या अवस्थेसोबतच शहरातील रोजगाराच्या प्रश्नावरही सरकारवर जोरदार टीका केली. नाशिक एमआयडीसीसह राज्यातील अनेक कंपन्या बंद पडल्यामुळे मोठ्या संख्येने कामगार बेरोजगार झाल्याचा दावा त्यांनी केला. गेल्या पाच वर्षांत तब्बल ३६ हजार कंपन्या बंद पडल्याची माहिती त्यांनी दिली. यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील सुमारे साडेसहा हजार कंपन्या आणि सर्व्हिस सेक्टरमधील १४ हजार कंपन्यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईत सुमारे १२ हजार तर पुण्यात ६ हजार ४३३ कंपन्या बंद पडल्याचा दावा खासदार वाजे यांनी केला. कंपन्या बंद पडण्यामागे विविध कारणे असल्याचे सांगतानाच काही कंपन्यांना स्थानिक पातळीवरील अडचणींचा सामना करावा लागल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, या कंपन्या बंद झाल्यामुळे किती कामगारांच्या उपजीविकेवर परिणाम झाला, याची स्पष्ट आकडेवारी अद्याप समोर आलेली नसल्याचा सवालही त्यांनी उपस्थित केला.

“बेरोजगार स्वप्न घेऊन काम शोधतात, मात्र त्यांना नोकरी मिळत नाही,” असे म्हणत वाजे यांनी रोजगाराच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले. कमी खर्चात काम करून घेण्यासाठी कंपन्यांकडून नव्या कामगारांची नियुक्ती करण्यापेक्षा उपलब्ध मनुष्यबळावरच भर दिला जात असल्याचा दावाही त्यांनी केला. नाशिकमध्ये कामावरून काढून टाकल्यानंतर एका कामगाराने आत्महत्या केल्याचा उल्लेख करत कर्जबाजारी झालेल्या कुटुंबांनी कर्जाची परतफेड कशी करायची, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्री म्हणून राज्यात गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न करणे चुकीचे नाही, असेही राजाभाऊ वाजे यांनी स्पष्ट केले. मात्र, एखादी कंपनी बंद पडल्यानंतर तिचा प्लॉट तसाच पडून राहतो. त्यावर कर्ज असल्यामुळे जमीन तातडीने उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे नवीन कंपन्या येण्यासाठीही वेळ लागतो, असे त्यांनी सांगितले.

नाशिकमधील रस्त्यांच्या अवस्थेवरूनही राजाभाऊ वाजे यांनी प्रशासनावर टीका केली. “नाशिकचे रस्ते नांगरलेल्या जमिनीसारखे झाले आहेत,” असे आपण यापूर्वी म्हटले होते, तेव्हा आपल्यावर टीका झाली होती. मात्र, आता रस्त्यांवरील खड्डे सर्वांना दिसत आहेत, असा टोला त्यांनी लगावला. खड्ड्यांमुळे वाहतुकीला मोठ्या अडचणी निर्माण होत असल्याचे सांगत याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्याची माहितीही त्यांनी दिली.

दरम्यान, या प्रश्नावर उद्धव ठाकरे गटाकडून १७ तारखेला नाशिकमध्ये मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती राजाभाऊ वाजे यांनी दिली. या मोर्चात मोठ्या संख्येने नाशिककर सहभागी होतील, असा दावा त्यांनी केला. खासदार संजय राऊत हे देखील या मोर्चाला उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे नाशिकच्या खड्ड्यांचा प्रश्न, रस्त्यांची दुरवस्था आणि रोजगाराचा मुद्दा आगामी काळात आणखी तापण्याची शक्यता आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Dharashiv Politics : ओमराजे निंबाळकरांनी पक्ष बदलताच गेम फिरला, धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नगरसेवक फुटले
  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in