
शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदार फुटल्याने अख्खा राज्यात खळबळ उडाली. शिंदेच्या या ऑपरेशन टायगरमुळे विविध चर्चांना उधाण आलं असून काल शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात ठाकरे गट आणि शिंदे गट, दोघांनीही यावरून एकमेकांवर यथेच्छ टीका केली. आता याच मुद्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील पहिली प्रतिक्रिया आली आहे. 6 खासदार फुटले आणि ते शिंदे गटात जाणार असल्याच्या बातम्यांवरून राजक ठाकरे पहिल्यांदाच बोलले.
संपूर्ण देशाचा विचका झालाय, राज्याचा विचका झालयं. आपण आपल्या राज्याचे किती नुकसान करतोय. आज अजून पाऊस पडला नाही, महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती येणार आहे आणि आमच्यातला काय चाललंय खासदार फोडणं, आमदार फोडणं, नगरसेवक फोडणं… वाट्टेल तेवढे पैसे आम्ही द्यायला तयार आहोत, माणसं विकली जात आहेत. या गोष्टीचा विचार राजकारणी, राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला नाही पाहिजे, हा विचार, जनतेने केला पाहिजे. ज्यांना निवडून आणण्यासाठी तुम्ही चार-पाच तास , उन्हामध्ये रांगेत उभे राहिलात. तो माणूस 50-100 कोटींसाठी विकल जातोय. त्यांना तुम्ही पुन्हा उभे करणार का ? आता ते आले तर तुम्ही निवडुन देणार का? राज्यात जे राजकारण सुरु आहे त्याने पुढच्या पिढीला काय सांगणार? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला
बातमी अपडेट होत आहे .
Leave a Reply