
राजकीय, आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीवर गंभीर चिंता व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या छायाचित्रावरून सुरू झालेल्या वादावर बोलताना, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पंक्तीत इतरांचे फोटो नसावेत, असे त्यांनी स्पष्ट केले. देशात वाढत्या धार्मिक ध्रुवीकरणावरही त्यांनी कठोर शब्दांत ताशेरे ओढले. समाजमाध्यमांद्वारे चुकीची माहिती पसरवून धर्मांधता वाढवली जात असून, लोकांनी धर्माभिमानी असावे पण धर्मांध नसावे, असे आवाहन त्यांनी केले. देशाच्या आर्थिक परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, सरकारने ७.८% जीडीपी वाढीचे दावे केले असले तरी, भारतीयांना परदेशी प्रवास न करण्याच्या आणि सोने खरेदी न करण्याच्या सूचना विरोधाभासी असल्याचे ते म्हणाले.
या सर्व घडामोडींशिवाय राज ठाकरेंनी एका महत्त्वाच्या विषायवर प्रकाश टाकला. राज ठाकरे यांनी काही कथाकार भाविकांची दिशाभुल करतात असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. यावेळी त्यांनी बाबांचं ऐकून घेणाऱ्या भाविकांची अॅक्शन करून दाखवली. जी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
Leave a Reply