• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Rain Update : आधीचा पावसाचा अंदाज खरा ठरला, आता पंजाबराव डख यांचा नवा अंदाज आला; पाऊस कुठे पडणार? कुठे सूर्य दिसणार?

July 6, 2026 by admin Leave a Comment


Weather Update : सध्या राज्यात पावसाचा जोर वाढलेला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांची पाणीपातळी वाढत आहे. धरणं भरायला लागली आहेत. कोकण किनारपट्टी, मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे या भागात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. त्यामुळे हा पाऊस आणखी किती दिवस असेल, असे विचारले जात आहे. याचे उत्तर हवामानाची माहिती देणारे पंजाब डख यांनी दिले आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक या जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. रत्नागिरीपासून ते पालघरपर्यंत हा पाऊस असेल. 8 जुलैपर्यंत पासवाचा असाच पावसाचा जोर असेल. 9 तारखेनंतर मुंबईला सूर्यदर्शन घडेल. 9 तारखेनंतर पुणे, नाशिक, कोल्हापूर या ठिकाणी पाऊस कमी होईल, असा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला. याआधी त्यांनी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त केला होता, त्यांचा हा अंदाज खरा ठरत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

राज्यात बऱ्याच भागात अजूनही पाऊस झालेला नाही. त्या भागातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बारामती, बीड, दौंड, उत्तर सोलापूर, सांगलीमध्ये जोरदार पावसाचे आगमन होणार आहे. सोलापूर जिल्ह्यात दक्षिण भागात थोडा पाऊस कमी असेल. 7 जुलैनं तर दक्षिण सोलापुरातही पाऊस होईल, असे पंजाबराव डख यांनी सांगितले.

मराठवाड्यात काय स्थिती?

त्यानंतर लातूर, बीड, परभणी, धाराशीव, जालना, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नांदेड, अहिल्यानगरातही बऱ्याच भागात पाऊस सुरू होणार आहे. आणखी दोन दिवस मराठवाड्यात पाऊस असेल. मराठवाड्यात 8 जुलैनंतर पावसाचा जोर कमी होईल. 9 तारखेला हवामान साधारण असेल. विदर्भात वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ या भागात आणखी दोन दिवस म्हणजे 7 जुलैपर्यंत पाऊस असेल, असे पंजाबराव डख म्हणाले आहेत.

विदर्भात काय स्थिती असेल?

अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशीम, हिंगोली या भागातही 8 जुलैपर्यंत पाऊस असेल. दुपारनंतर पश्चिम विदर्भात पाऊस कमी असेल. नंदूरबार, धुळे, जळगाव, श्रीरामपूर, अहिल्यानगरातील काही भागात सध्या पाऊस नाही. परंतु या भागातही 8 जुलैपर्यंत पाऊस असेल, असेही भाकित त्यांनी व्यक्त केले आहे.

तीन दिवस पावसाळी वातावरण

कोल्हापूरच्या पंचगंगेची पातळी वाढणार आहे. या भागात घाटमाथ्यावर पासवाचा जोर कायम असेल. पंचगंगेची पाणीपातळी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता कमी आहे. उजनी धरण वेगाने भरत आहे. त्यामुळे निळवंडे, भंडारदरा धरणही भरत आहे. एकूणात राज्यात आणखी तीन दिवस पावसाळी वातावरण आहे. त्यानंतर सगळीकडे सूर्यदर्शन होईल. मुंबईतील जनतेने आणखी तीन दिवस स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in