• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Rain Update : आधीचा पावसाचा अंदाज खरा ठरला, आता पंजाबराव डख यांचा नवा अंदाज आला; पाऊस कुठे पडणार? कुठे सूर्य दिसणार?

July 6, 2026 by admin Leave a Comment


Weather Update : सध्या राज्यात पावसाचा जोर वाढलेला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांची पाणीपातळी वाढत आहे. धरणं भरायला लागली आहेत. कोकण किनारपट्टी, मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे या भागात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. त्यामुळे हा पाऊस आणखी किती दिवस असेल, असे विचारले जात आहे. याचे उत्तर हवामानाची माहिती देणारे पंजाब डख यांनी दिले आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक या जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. रत्नागिरीपासून ते पालघरपर्यंत हा पाऊस असेल. 8 जुलैपर्यंत पासवाचा असाच पावसाचा जोर असेल. 9 तारखेनंतर मुंबईला सूर्यदर्शन घडेल. 9 तारखेनंतर पुणे, नाशिक, कोल्हापूर या ठिकाणी पाऊस कमी होईल, असा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला. याआधी त्यांनी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त केला होता, त्यांचा हा अंदाज खरा ठरत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

राज्यात बऱ्याच भागात अजूनही पाऊस झालेला नाही. त्या भागातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बारामती, बीड, दौंड, उत्तर सोलापूर, सांगलीमध्ये जोरदार पावसाचे आगमन होणार आहे. सोलापूर जिल्ह्यात दक्षिण भागात थोडा पाऊस कमी असेल. 7 जुलैनं तर दक्षिण सोलापुरातही पाऊस होईल, असे पंजाबराव डख यांनी सांगितले.

मराठवाड्यात काय स्थिती?

त्यानंतर लातूर, बीड, परभणी, धाराशीव, जालना, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नांदेड, अहिल्यानगरातही बऱ्याच भागात पाऊस सुरू होणार आहे. आणखी दोन दिवस मराठवाड्यात पाऊस असेल. मराठवाड्यात 8 जुलैनंतर पावसाचा जोर कमी होईल. 9 तारखेला हवामान साधारण असेल. विदर्भात वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ या भागात आणखी दोन दिवस म्हणजे 7 जुलैपर्यंत पाऊस असेल, असे पंजाबराव डख म्हणाले आहेत.

विदर्भात काय स्थिती असेल?

अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशीम, हिंगोली या भागातही 8 जुलैपर्यंत पाऊस असेल. दुपारनंतर पश्चिम विदर्भात पाऊस कमी असेल. नंदूरबार, धुळे, जळगाव, श्रीरामपूर, अहिल्यानगरातील काही भागात सध्या पाऊस नाही. परंतु या भागातही 8 जुलैपर्यंत पाऊस असेल, असेही भाकित त्यांनी व्यक्त केले आहे.

तीन दिवस पावसाळी वातावरण

कोल्हापूरच्या पंचगंगेची पातळी वाढणार आहे. या भागात घाटमाथ्यावर पासवाचा जोर कायम असेल. पंचगंगेची पाणीपातळी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता कमी आहे. उजनी धरण वेगाने भरत आहे. त्यामुळे निळवंडे, भंडारदरा धरणही भरत आहे. एकूणात राज्यात आणखी तीन दिवस पावसाळी वातावरण आहे. त्यानंतर सगळीकडे सूर्यदर्शन होईल. मुंबईतील जनतेने आणखी तीन दिवस स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • किल्ले, धरणं, धबधबे, ठाण्यात सगळं बंद, जिल्हाधिकाऱ्यांचा तडकाफडकी आदेश; नागरिकांसाठी मोठी सूचना!
  • FD पेक्षाही चांगला परतावा देणाऱ्या योजना; बाजारात LIC चे 5 जबरदस्त प्लान, एकदा वाचाच
  • घाटात 600 मिमीपेक्षा जास्त पाऊस, ट्रॅकची खडी वाहून गेली, दरडींमुळे मुंबई-पुणे रेल्वे मार्ग क्षतिग्रस्त, मार्ग कधी सुरु होणार ?
  • मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची महत्त्वाची बैठक सुरू, बारामतीतील…
  • Rain Update : आधीचा पावसाचा अंदाज खरा ठरला, आता पंजाबराव डख यांचा नवा अंदाज आला; पाऊस कुठे पडणार? कुठे सूर्य दिसणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in