• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Rahul Gandhi : ‘मोदी ने मरवा दिया’, काँग्रेसच्या महत्वाच्या बैठकीत राहुल गांधींचे शब्द

June 12, 2026 by admin Leave a Comment


भीषण गर्मी असूनही गुरुवारी इंदिरा भवनमध्ये पत्रकार मोठ्या संख्येने जमले होते. सर्व जण काँग्रेस नेतृत्वाने बोलवलेल्या आवश्यक बैठकीचं कवरेज करण्यासाठी आले होते. NEET, CBSE, महागाई, बेरोजगारी आणि पेपर लीक या मुद्यांवरुन मोदी सरकार विरोधात रणनिती बनवणं हा या बैठकीचा उद्देश होता. काँग्रेसचे सर्व सरचिटणीस, राज्य प्रभारी आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष या बैठकीत सहभागी झाले होते, त्यावरुन या बैठकीचं महत्व लक्षात येतं. चर्चे दरम्यान लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी ‘मोदी ने मरवा दिया’अशी टिप्पणी केली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या धोरणांवर कठोर शब्दात टीका केली.

“बेरोजगारीमुळे देशातील युवक त्रस्त आहेत. परीक्षा पेपर लीक झाल्याने विद्यार्थी हैराण आहेत. परराष्ट्र धोरणातील कमकुवतपणामुळे महागाई वाढतेय. यात सामान्य आणि गरीब नागरिक दोघे प्रभावित होतायत. शेतकऱ्यांना अमेरिकेसोबत होणाऱ्या ट्रेड डीलची चर्चा आहे. संविधानाकडे दुर्लक्ष करुन लोकशाहीला कमजोर केलं जातय” असं राहुल गांधी बोलल्याची माहिती सूत्रांनी दिली. लोकांना सध्या कठीण परिस्थितीतून जावं लागतय, त्यावर भाष्य करताना ‘मोदी ने मरवा दिया’ असं पटकन राहुल गांधी बोलून गेले. ‘मरवा दिया’ या शब्दाचा अर्थ दुसऱ्यामुळे नुकसान होणं असा होतो. “अर्थव्यवस्थेची हालत इतकी खराब होईल की, वर्षभरानंतर मोदी पंतप्रधानपदी राहणार नाहीत” असं सुद्धा राहुल गांधी याआधी बोलले आहेत.

हे काम फक्त काँग्रेस पक्षच करु शकतो

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तृणमुल नेते अभिषेक बॅनर्जी यांच्या राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यासोबत बैठका झाल्या. त्यानंतर विरोधी पक्ष एकजुटीच्या नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत. या बैठकीत काँग्रेस नेत्यांना संबोधित करताना राहुल गांधी यांनी संघटनात्मक बांधणीवर भर देणं गरजेच असल्याचं म्हटलं. ते म्हणाले की, ‘काँग्रेसचं एकमेव पक्ष आहे, जो राष्ट्रीय स्तरावर भाजप आणि RSS चा प्रभावीपणे सामना करु शकतो’

देशाव्यापी अभियान सुरु करण्याची घोषणा

राहुल गांधी यांनी पक्ष नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचं आवाहन केलं. आर्थिक आणि सामाजिक मुद्यांवर जनतेची वाढती नाराजी ही विरोधी पक्षासाठी सर्वसामान्य नागरिकांसोबत कनेक्ट होण्याची संधी आहे असं राहुल गांधी म्हणाले. काँग्रेसने महागाई, वाढत्या किंमती, बेरोजगारी आणि एग्जाम पेपर लीक सारख्या मुद्यांवर देशाव्यापी अभियान सुरु करण्याची घोषणा केली आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अहंकारामुळे अजय देवगण-करिश्मा कपूरचा हा चित्रपट कधीच प्रदर्शित झाला नाही, निर्मात्यांचं झालं मोठं नुकसान
  • NCERT Portion | 1975 ची आणीबाणी आता शाळेत शिकवणार; NCERT चा मोठा निर्णय चर्चेत!
  • Narsapur case: तुला काय शिक्षा देऊ तूच सांग? कोर्ट संतापलं; नरसापूर प्रकरणात थेट आरोपीलाच विचारणा
  • ‘गरीब बापाने काय करायचं?’ निखिल चव्हाणला लग्नात सासऱ्यांनी दिली महागडी गाडी? फोटोवरून संतापले नेटकरी
  • Shivsena | आधी फुटले, आता म्हणतात, उद्धव ठाकरेंचं परभणीत स्वागत करू; खासदार संजय जाधवांचं मोठं विधान; नेमकं काय म्हणाले?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in