• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Rahul Gandhi: पोलिसांना कारवाईचे आदेश गृह मंत्र्यालयाने दिले, राहुल गांधींचा गंभीर आरोप , लोकसभेत तुफान हंगामा

July 29, 2026 by admin Leave a Comment


NEET सह देशातील इतर परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीविरोधातील कायदा दुरुस्ती विधेयकावर कालपासून लोकसभेत घमासान चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत आज धुरळा उडवून दिला. त्यांनी पोलिसांना विद्यार्थ्यांवर कारवाईचे आदेश गृहमंत्रालयाने दिल्याचा गंभीर आरोप केला. त्यानंतर एकच गदारोळ उठला. सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधी यांनी या दाव्याच्या पुष्ट्यार्थ पुरावा देण्याची आग्रही भूमिका मांडली. राहुल गांधी यांनी या वक्तव्यासाठी माफी मागावी अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी केली. त्यानंतर गोंधळ वाढला. राहुल गांधी यांनी आपला माईक बंद करण्यात आल्याचा आरोप केला. तर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज तहकूब केले.

तरुणांचा राग हिंसा कशी?

विद्यार्थी, मूर्ख आणि अंधभक्त हे उदाहरण देताच सत्ताधाऱ्यांनी एकच गोंधळ केला. विरोधी पक्षनेते असंसदीय शब्द वापरत असल्याचा दावा त्यांनी केला. विद्यार्थ्यांचे आंदोलन हा राग नव्हता. द्वेष तर नव्हताच नव्हता. विद्यार्थ्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. विद्यार्थ्यांचा राग हा योग्य होता, असे राहुल गांधी म्हणाले. देशाने पण तरुणाची भाषा समजली पण सरकारला त्यांची भावना उमगली नाही. राहुल गांधी म्हणाले की देशाचे भविष्य रस्त्यावर उतरले. मी विचार करत होतो की कुठून भाषण सुरू करु. जंतर मंतरवर विद्यार्थ्यांची भावना दिसत होती. तरुणांचा राग हिंसा कशी? भाजप नेत्यांनी त्यांच्या मुलांना विचारावं, असे राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर निशाणा

लोकसभेत पेपरफुटीविरोधातील कायद्याच्या दुरुस्तीविधेयकावर बोलताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर थेट निशाणा साधला. या देशाच्या भविष्याने रस्त्यावर उतरून जे काही केले, तो ना राग होता ना, द्वेष ना, हिंसा. तर तो या देशातील तरुणाईचा आवाज होता. सर्व राजकीय पक्षांनी तरुणांच्या आवाजाचा सन्मान करायला हवा. त्यात भाजपमधील माझे मित्रांचा पण समावेश आहे. भाजपमधील माझ्या मित्रांनी, त्यांच्या मुलांना विचारावे की, त्यांचे भाऊ-बहीण काय करत होते. तर ते सांगितील की त्यात काहीच चूक नाही. प्रत्येक भारतीयाला तसे करायला हवे. मी ही गोष्ट सर्वांसमोर ठेवली आहे.

राहुल गांधी यांनी सांगितले की, विद्यार्थी हा सत्यासाठी धावत आहे. विद्यार्थ्यांसाठी सत्य हे गोड असते. मी विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान अनेक विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली. आमचे विद्यार्थी, शिक्षण व्यवस्था, खर्चाची माहिती देते होते. 8-10 तास मुलं अभ्यास करतात असे राहुल गांधी म्हणाले. दरम्यान राहुल गांधी यांच्या माफीवरून सत्ताधारी अडून बसले त्यांनी एकच गदारोळ केला.  त्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी लोकसभेचे कामकाज काही काळासाठी तहकूब केले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in