• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Neem Karoli Baba: नीम करोली बाबांची पत्नी कोण?  संन्यास घेतल्यावर पुढे संसाराचं झालं काय?

September 5, 2026 by admin Leave a Comment


नीम करोली बाबा नाव ऐकताच अनेकांच्या मनात एक छबी तयार होते. त्यांचे भक्त केवळ भारतातच आहेत असं नाही तर देशविदेशातही त्यांचे भक्त आहेत. उत्तराखंडमधील कैची धाम ते अमेरिकेपर्यंत त्यांच्या कार्याची महत्त्वी पसरली आहे. जगातील अनेक दिग्गज त्यांचे भक्त होते. पण त्यांच्या सांसारिक जीवनाचा एक भाग ही आहे. जो अनेकांना माहिती नाही. त्यांचे लग्न झाले होते का? त्यांच्या पत्नीचे नाव काय होते? संत झाल्यावर त्यांच्या संसाराचं पुढे काय झालं? असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात आहेत. बाबांनी संन्यास घेतल्यावर त्यांच्या पत्नीने कुटुंबाची जबाबदारी सांभाळली. काय आहे याविषयीची माहिती?

नीम करोली बाबांचे गृहस्थ जीवन, अनेक लोकांना नाही माहिती

नीम करोली बाबांचा जन्म हा उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यातील अकबरपूर या गावात झाला होता. त्यांचे मूळ नाव लक्ष्मण दास शर्मा असल्याचे सांगण्यात येते. बालपणातच त्यांचा ओढा धार्मिक कार्याकडे होता. त्यावेळच्या परंपरेनुसार, त्यांचे लहान वयातच लग्न लावण्यात आले होते. याविषयीच्या दाव्यानुसार, त्यांचे लग्न जवळपास 11–12 व्या वर्षी करण्यात आले होते. पण पुढे त्यांनी संन्यास स्वीकारला. त्यांनी लग्न झाल्याचे कधी लपवले नाही.

नीम करोली बाबा यांच्या पत्नीचे नाव काय?

नीम करोली बाबा यांच्या पत्नीचे नाव राम बेटी देवी (Ram Beti Devi) असल्याचे सांगण्यात येते. उत्तर प्रदेशातील एका ब्राह्मण कुटुंबातील राम बेटी देवी या लग्नानंतर अकबरपूर गावात आल्या. बाबांच्या आध्यात्मिक जीवनाची चर्चा होत असली तरी राम बेटी देवी या चर्चांपासून दूर असल्याचे दिसते. त्या कधी आश्रमाच्या व्यवस्थापनात असल्याचे दिसून येत नाही. गावातील लोक त्या अत्यंत साध्या आणि सरळ स्वभावाच्या असल्याचे सांगतात.

संन्यास घेतल्यानंतर पत्नीचे आयुष्य कसे होते?

लग्न झाल्यानंतर काही वर्षांनी लक्ष्मण दास यांनी संन्यास स्वीकारला. ते अध्यात्मिक यात्रेवर निघाले. अनेक वर्ष ते देशभरात फिरले. या काळात त्यांना लोक विविध नावांनी ओळखत होते. पण ते नीम करोली बाबा या नावाने प्रसिद्ध झाले. त्यांनी घराकडे पाठ फिरवल्यानंतर राम बेटी देवी यांनी घराची जबाबदारी खांद्यावर घेतली. त्या शेतात राबत आणि घरची कामं करीत. त्यांनी मुलांना वाढवले. त्यांचे आयुष्य एखाद्या संताच्या पत्नीप्रमाणे नाही तर ग्रामीण भागातील महिलेसारखे होते.

नीम करोली बाबा कुटुंबाला भेटत होते?

अनेकांना अशी उत्सुकता आहे की, नीम करोली बाबा हे त्यांच्या मूळ गावी अकबरपूर येथे यायचे का? पत्नीसह कुटुंबियांना भेटायचे का? तर बाबा अनेकदा अकबरपूर गावात आले. ते कुटुंबाला भेटले. पण त्यांचा मोठा वेळ हा साधना आणि धार्मिक यात्रांमध्ये जात होता. या कालावधीत ते भक्तांशी संवाद साधायचे. आध्यात्मिक चर्चा करायचे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
  • Gulabrao Patil : भाजपवाले पक्ष फोडतात, तुम्हीही विद्यार्थी फोडा! गुलाबराव पाटलांचा शिक्षकांना अजब सल्ला
  • माझे व्हिडीओ म्हणजे सोशल सर्व्हिस, पुरुषांचा ताण कमी होतो, पूनम पांडेच्या वक्तव्याने खळबळ
  • Kangana Ranaut : तुम्ही तर माझ्यापेक्षा पण चांगला अभिनय करता हो, फालतूमध्ये..बैठकीत कंगना रणौतने चांगलचं सुनावलं
  • Pimpri Chinchwad Dahi Handi Death : दहीहंडीची कमान अंगावर पडली अन्…; पिंपरी चिंचवडमध्ये दुर्घटना कशी घडली, सलमा यांच्या मृत्यूचं कारण समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in