
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मुंबईकरांना दिलासा देणारा पाऊस शहरात दाखल झाला आहे. मुंबईतील बांद्रा, लोअर परेलसह विविध भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आज पहाटेपासूनच मुंबई उपनगरांसह शहरातील अनेक भागांत पावसाची जोरदार सुरुवात झाली. बांद्रा, लोअर परेल परिसरात मुसळधार सरी कोसळताना पाहायला मिळाल्या, तर छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरातही रिमझिम पावसाने वातावरण आल्हाददायक झाले.
दरम्यान, हवामान विभागाने मुंबई आणि उपनगरांसाठी यलो अलर्ट जारी केला असून, पुढील काही तासांत काही भागांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
पावसाच्या आगमनामुळे तापमानात घट झाली असून, गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या उकाड्यापासून मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, नागरिकांनीही या पावसाचे स्वागत केले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस मुंबई आणि आसपासच्या परिसरात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
Leave a Reply