• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Manoj Jarange Patil: फडणवीस तरी माझं काय वाकडं करणार? मनोज जरांगे पाटील यांचे विधान चर्चेत

August 30, 2026 by admin Leave a Comment


मराठा आंदोलनक मनोज जरांगे पाटील यांनी आज पासून पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. ते अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसले आहेत. दरम्यान, परभणी येथे होणाऱ्या शेतकरी मेळाव्यावरुन मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी हा मेळावा रद्द करण्याची मागणी शिंदे गटाचे खासदार संजय जाधव यांनी केली. त्यानंतर, मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

“देवेंद्र फडणवीसांचे 100 टक्के दिवस भरले आहेत”

मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, “चार घरी शुटिंग करुन चार पोलिसांना देता ते तरी काय करणार आहेत? काय करणार आहे फडणवीस तरी वाकडं? तुम्ही तरी किती मरमर करणार? बसा खूर्ची टाकून चहा वैगरे प्या. काय होणार ते माहिती नाही. तुमचं काम तुम्ही करा. काय होणार आहे? मी चार वेळा बोलवत आहे त्यांना. आता त्यांचे दिवस भरत आलेत. देवेंद्र फडणवीसांचे 100 टक्के दिवस भरले आहेत. लय पाप झाल्यावर तसच असतं. कोणता पोलीस सुखी आहे?”

आधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा

परभणी येथील शेतकरी मेळ्याव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी होणार आहेत. पण जरांगे पाटील यांनी थेट एकनाथ शिंदे यांनी या मेळाव्यात सहभागी होऊ नये असे म्हणत त्यांच्यावर टीका केली. ‘नांदेडचेही लोक रस्त्यावर आले, तर शिंदे हेलिकॉप्टरने थेट मुंबईला जाईल. आपण जाऊन ताकद वाया घालवायची नाही. मी हा देखील विचार करत आहे. जालन्यातून परभणीत वेळेत पोहोचणं शक्य वाटत नाही. पोलिसांचं टेन्शन घेऊ नका. परभणी नाकाबंदी केली तरी काही अडचण नाही. पोलिसांचा आणि आमचा संबंध नाही. सरकार आणि आमचा संबंध आहे.’

पुढे मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ‘मी निघाल्यावर रस्त्यावर एकच गर्दी होईल. त्यांना नांदेडमध्ये जाणं अवघड होईल. आपला आणि त्यांचा सामना झाला पाहिजे. मर्दासारखा सामना झाला पाहिजे. मग काय व्हायचं ते होऊ द्या. त्यांना रक्तपात करायचं असेल, तर होऊद्या. त्यांच्या हातातून होऊ द्या. पण सामना झाला पाहिजे. सामना बरोबरीचा झाला पाहिजे. एकनाथ शिंदे समोर भेटले पाहिजे. पोलिसांची काळजी करू नका. पोलिसांचं टेन्शन करू नका. त्यांचं मी बघतो. खोटा टाइम मॅच करू नका. माझ्या समाधानासाठी वेळ देऊ नका. सामना होणे गरजेचे आहे.’



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रक्षाबंधननंतर लगेच राखी काढली? जाणून घ्या राखी कधी सोडणं योग्य मानलं जातं…
  • वरलक्ष्मी व्रताचा शुभ दिवस, धनप्राप्तीसाठी करा ‘हे’ 3 सोपे उपाय
  • जरांगेंना बच्चू कडूंचा थेट फोन; शिंदेंच्या मेळाव्याबाबत नेमकं काय म्हणाले?
  • 4 कॅमेरे अन् 5000mAh बॅटरी; Samsung चा 5G फोन तब्बल 12 हजारांनी स्वस्त, जाणून घ्या ऑफर किंमत
  • आरोग्य आणि चवीचा खजिना; घरी बनवा शुद्ध नारळाचे दूध,जाणून घ्या बनवण्याची सोपी रेसिपी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in