• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Manoj Jarange Patil : पाटील माझ्या गाडीत बसा आणि..मनोज जरांगे पाटील यांनी डिफेंडर गाडीवरुन होत असलेल्या आरोपांवर दिलं स्पष्टीकरण

August 11, 2026 by admin Leave a Comment


मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील सध्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. एका अपघातग्रस्ताची भेट घेण्यासाठी ते आले होते. “अपघात झाला, त्याची तब्येत आता खूप चांगली आहे. मी त्याला भेटलो आहे. अपघातग्रस्त किरण भगत यांनीच सांगितलं नियोजित दौरा पूर्ण करा, दौरा थांबवू नका” असं मनोज जरांगे पाटील बोलले. “मला कागदपत्र ज्याने दिलं, त्याचं नाव स्वामी आहे. मी आता नाव जाहीर करतो. संबंधात-संबंधात फरक आहे, देवेंद्र फडवणीस आणि बावनकुळे यांचे संबंध काय आहेत? मला माहित नाही” असं मनोज जरांगे पाटील बोलले. जरांगे पाटील हे डिफेंडर गाडीमधून फिरतात, यावर आरोप होत आहेत. त्यावर जरांगे पाटील बोलले.

“मी समाजाचं काम करतो. समाजाला मायबाप मानलं आहे. माझ्या समाजातल्या लोकांनी एखादी नवीन गाडी घेतली तर पाटील माझ्या गाडीत बसा आणि फिरा असे म्हणतात. तुम्हा कोणाला गाडी कोण देतं का?” असा सवाल जरांगे पाटील यांनी केला. “माझे खूप उकरू लागले आहात. माझ्यावर खूप लक्ष आहे यांचं” असं जरांगे पाटील बोलले. मनोज जरांगे पाटील आज सांगली जिल्ह्यातल्या विटा शहरात आले होते. तिथून ते मायनीच्या दिशेने रवाना झाले.

उलटे दिवस फिरले तर लय अवघड होईल

“सर्वांनी समाजासाठी आत्मीयतेने काम करावं. अपघात झाल्यानंतर कार्यक्रम रद्द करण्याचा विचार होता, पण आमचा सहकारी म्हणाला दौरा पूर्ण करा. तुम्ही जर आमच्या माग लागले ना तर तुमचा देव्हारा करेल लक्षात ठेवा. समाजाला न्याय मिळावा म्हणून आम्ही काम करत आहे. तुम्ही जाणून बुजून आमच्यात फूट पडण्याचा प्रयत्न करता आहात” असं मनोज जरांगे म्हणाले. “खोट्या केसेस करणाऱ्या लोकांना आम्ही मोजत नाही. आज सत्ता तुमच्या हातात आहे, पण उलटे दिवस फिरले तर लय अवघड होईल. मी आता बावनकुळे यांच्या फार मागे लागणार आहे. अधिकाऱ्यांनी प्रवक्ता होऊ नये, आपलं वेगळं स्टेटस असतं. आता नवीन एक पत्र काढला आणि तो अधिकारी बावनकुळे यांच्या बाजूने बोलत आहे” असं मनोज जरांगे पाटील बोलले.

माझ्या मस्तकात बसला तर त्याचा बाजार उठविल्याशिवाय राहणार नाही

“असल्या अधिकाऱ्यांनी माझ्या नदी लागू नये जर का माझ्या मस्तकात बसला तर त्याचा बाजार उठविल्याशिवाय राहणार नाही. रद्द केलेले प्रमाणपत्र आपल्याला पुन्हा पाहिजे,त्याशिवाय आपण गप्प बसणार नाही. या 29 ऑगस्टला पूर्ण आरक्षण देणार आहे, सगळ्या अंमलबजावणी घेणार. प्रत्येक घरात जाऊन समाज बांधवाना जागं करा आणि ही लढाई जिंकून द्यायची” असं मनोज जरांगे पाटील बोलले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Amitabh Bachchan : अख्खं जग विसरलात तरी चालेल पण… विवाहीत पुरूषांना बिग बींनी काय दिला कानमंत्र ?
  • IND vs SL Test: भारत श्रीलंका दुसरा कसोटी सामना ड्रॉ, पण नोंदवले गेले इतके सारे विक्रम; काय ते जाणून घ्या
  • मुदतवाढ मिळाली तरी अमराठी चालकांना मराठी शिकावीच लागेल; मंत्री प्रताप सरनाईकांनी ठणवाकवलं
  • Abhijit Dipke : अभिजीत दिपके यांच्या CJP ने निवडणूक लढवली तर किती मतदान होणार? सर्व्हेतून धक्कादायक माहिती
  • काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचे पंतप्रधानांना पत्र; डिलिमिटेशनबाबत मोठी अपडेट समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in