
तुम्ही आम्हाला 58 लाख नोंदी दिल्या आहेत. आम्ही म्हणतो आता तुम्ही आम्हाला कुणबी प्रमाणपत्र द्या. तुम्ही तलाठी, ग्रामसेवक आणि तत्सम अधिकाऱ्यांना प्रमाणपत्र द्यायला सांगा. यादी लावायला सांगा, अशी अटच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) यांनी सरकारच्या शिष्टमंडळाकडे ठेवली आहे. राज्याचे मंत्री शंभुराज देसाई, राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत आणि प्रसाद लाड हे अंतरवली सराटीत आले आहेत. मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करत आहेत. या चर्चेच्यावेळी जरांगे यांनी ही मागणी केली आहे.
मराठा आरक्षणाची मागणी लावून धरणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. 29 ऑगस्टपासून उपोषणाचं हत्यार ते उपसणार आहेत. याचदरम्यान त्यांच्याकडून सरकारवर चौफैर टीकास्त्र सोडण्यात आलं. जरांगे यांची आक्रमक भूमिका आणि या आंदोलनाचं काउंटडाऊन सुरू झालेलं असताना नेत्यांची धावाधाव सुरू झाली. जरांगे यांच्या भेटीसाठी आज दुपारी सरकारचं शिष्ट मंडळ अंतरवाली सराटीत दाखल झालं. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत, मंत्री शंभूराजे देसाई, आमदार प्रसाद लाड यांनी जरांगे यांच्याशी चर्चा सुरू असून 58 लाख नोंदीवरून जरांगे सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा करत आहेत.
बातमी अपडेट होत आहे.
Leave a Reply