
गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत उकाडा कायम असून तापमानाचा पारा ३४ ते ३५ अंशांवर नोंदवला जात आहे. मात्र मागील काही दिवसांपासून रात्री उष्णतेचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. किमान तापमानातही मागील दोन दिवसांपासून सरासरी तापमानाहून वाढ नोंदवली जात आहे. सोमवारीही मुंबईत उष्ण आणि दमट वातावरणाची नोंद झाली. तसंच मुंबईसह पालघर, ठाणे इथं बुधवारपर्यंत हीच स्थिती राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यात एकीकडे मान्सूनपूर्व घडामोडींना वेग आला असताना दुसरीकडे विदर्भात तीव्र उष्णतेची लाटेसदृश स्थिती कायम आहे. त्याचबरोबर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची नोंद होत असून अचानक वातावरणात बदल होऊन बरसणाऱ्या पावसामुळे नागरिकांना उन्हापासून तात्पुरता दिलासा मिळत आहे. यासह देश-विदेशातील, मनोरंजन, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील अपडेट्स एका क्लिकवर जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.
Leave a Reply