
कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन आता थांबलं असलं तरी शाब्दीक वादावादी सुरुच आहे. अभिनेत्री कंगना राणौत आणि सीजेपीचा प्रवक्ता सौरव दास यांच्यातील शाब्दीक युद्ध मीडियामध्ये गाजत आहे. दरम्यान महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यांमध्ये पावसाच इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात पावसाचा जोर अधिक वाढेल. मराठवाडा, विदर्भ आणि कोकण घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नांदेड शहरासह काही भागात सकाळ पासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालीय. या पावसाळ्यातील हा सगळ्यात मोठा पाऊस आहे. अर्धातासापासून पडत असलेला पाऊस पिकांना वरदान ठरणार आहे. या पावसामुळे पहिल्यांदाच खळखळून भरून नाल्या वाहणार आहेत. जलसाठे भरण्यासाठी नांदेड जिल्ह्यात आणखीन मोठ्या पावसाची गरज आहे. सध्या शेतकऱ्यांचे पावसाकडे डोळे लागले आहेत.
Leave a Reply