
विदर्भात सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केली असून अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांत तापमानाचा पारा ४५ अंशांच्या पार गेला आहे, तर नागपूरसह इतर शहरांत ४२ ते ४४ अंशांची नोंद झाल्याने नागरिक उन्हाने हैराण झाले असून प्रशासनाने दुपारच्या वेळी कामाशिवाय बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. दुसरीकडे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी २७ एप्रिलला मतदार यादी प्रसिद्ध होणार असून, सलग १० वर्षे संचालक राहिलेल्यांना निवडणूक लढवता येणार नसल्याच्या नवीन नियमामुळे आमदार अब्दुल सत्तार, खासदार संदीपान भुमरे आणि अंबादास दानवे यांसारख्या दिग्गजांना धक्का बसला असून ते आपल्या वारसांना मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये महिला लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अटकेत असलेला भोंदू बाबा अशोक खरात याची पोलीस कोठडी संपत असल्याने त्याला आज पुन्हा कोर्टात हजर केले जाणार असून एसआयटी त्याची कोठडी वाढवून मागण्याची शक्यता आहे. दरम्यान, कल्याणात भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या देशातील पहिल्या भव्य स्मारकाचा भूमिपूजन सोहळा गीताताई गुंडे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला, तर मुंबईत हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे स्थानकांदरम्यान घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना लोकलच्या विलंबाचा सामना करावा लागत आहे. यासह राज्यातील इतर ठळक घडामोडी या ब्लॉगमध्ये वाचू शकता.
Leave a Reply