• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Maharashtra Dark Sky Village : महाराष्ट्रातलं हे ठिकाण ठरणार देशातलं पहिलं ‘डार्क स्काय’ गाव.. नक्की काय घडणार ?

September 2, 2026 by admin Leave a Comment


Maharashtra Dark Sky Village : महाराष्ट्रातील एक गाव पहिलं ‘डार्क स्काय कम्युनिटी’ बनण्याच्या तयारीत आहे. राज्यातील नाशिक जिल्ह्यातील आदिवासीबहुल उदमळ हे गाव आता रात्रीचे आकाश जपण्यासाठी एक अनोखा उपक्रम राबवत आहे. त्यामुळे या गावाला पहिलं ‘डार्क स्काय कम्युनिटी’ बनवण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहे. रात्रीच्या वेळी कृत्रिम प्रकाश कमी करून आकाशातील तारे स्पष्टपणे दिसावेत आणि प्रकाश प्रदूषणाला आळा घालावा, हा या उपक्रमा मागचा मुख्य उद्देश आहे.

कोणी केली सुरूवात ?

या मोहिमेची सुरूवात गावातील 22 वर्षीय विपुल खराडी या विद्यार्थाने केली. मिळालेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी विपुलने रात्रीच्या वेळी आकाश निरीक्षण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने गावातील नागरिकांशी संवाद साधायचा प्रयत्न केला. आणि स्वच्छ आणि अंधारमय रात्रीचे आकाश केवळ निसर्गाचा सुंदर ठेवा नसून, त्यातून पर्यटन आणि रोजगाराच्या संधीही निर्माण होऊ शकतात, हे त्याने पटवून दिलं.

या योजनेसाठी किती निधी मंजूर ?

त्याच्या प्रयत्नांना हळूहळू गावकऱ्यांचाही पाठिंबा मिळू लागला. जिल्हा प्रशानसाची देखील आा या उपक्रमाला साथ मिळाली आहे. 2026-27 या आर्थिक वर्षासाठी जिल्हा प्रशासनाने 42.14 लाख रुपयांचा निधी मंजूर केला. हा निधी आदिवासी उपयोजनेअंतर्गत मंजूर करण्यात आला. मंजूर करण्यात आलेल्या या निधीतून रात्रीच्या आकाशाच्या गुणवत्तेचे परीक्षण करण्यात येईल, तसेच प्रकाश प्रदूषणाबाबत जनजागृती मोहीम राबलवली जाईल. एवढंच नव्हे तर स्थानिक तरुणांना प्रशिक्षण देण्याचं काम केलं जाणार आहे. गावातील अनावश्यक कृत्रिम प्रकाश कमी करून पर्यावरणपूरक बाह्य प्रकाशव्यवस्था स्वीकारण्यावरही भर दिला जाणार आहे. यासंदर्भात ग्रामसभेने ठराव मंजूर केला.

11 ठिकाणांमध्ये उदमळचा समावेश

उदमळ हे राज्य सरकारने ‘इंटरनॅशनल डार्क स्काय प्लेस’चा दर्जा मिळवण्यासाठी निवडलेल्या 11 ठिकाणांपैकी एक आहे. या यादीत कास पठार, लोणार आणि तोरणमाळ यांसारख्या प्रसिद्ध ठिकाणांचाही समावेश आहे. उदमळमधील स्वच्छ आणि ताऱ्यांनी भरलेलं रात्रीचं आकाश हे पर्यटकांसाठी आकर्षण ठरेल, अशी प्रशासनाला आशा आहे. त्यामुळे खगोल पर्यटनाला चालना मिळण्यासोबतच स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात. उत्पन्नाचा नवा स्रोत मिळू शकतो. उदमलचे आकाश प्रकाश प्रदूषणापासून मुक्त राहिल्यास, हे गाव भविष्यात खगोल पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र बनण्याची शक्यता आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Shivsena Symbol Dispute : एकनाथ शिंदेंनी पक्षातून बंडखोरी का केली? शिवसेना शिंदे गटाच्या वकिलाचा सुप्रीम कोर्टात थेट मोठा दावा
  • शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीदरम्यान मोठा ट्विस्ट! शिंदेंचे वकिल फिरवणार डाव? नेमक्या मुद्यावर युक्तिवाद
  • ठाकरे गटाची धाकधूक वाढली? शिंदे गटाच्या वकिलाचा तोडीस तोड युक्तिवाद; थेट निवडणूक आयोग….
  • एसीरुम या वस्तू ठेवण्याची कधीही चूक करु नका, एकदा कारण नक्की घ्या जाणून
  • रवींद्र जडेजा सर जेफरी बॉयकॉट यांचा लाडका! आवडता खेळाडू असण्याचं कारण काय? जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in