• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Knowledge : झाडं अचानक झाली नष्ट तर पृथ्वीचं काय होणार? माणूस जिवंत राहणार का? वाचा सविस्तर

September 5, 2026 by admin Leave a Comment


तुम्ही कधी विचार केला आहे का की, जर या पृथ्वीवरुन सगळी झाडं नष्ट झाली तर माणसांसाठी सर्वात मोठा धोका कोणता असेल. तुम्हाला वाटेल ऑक्सिजनची समस्या निर्माण होईल. परंतु याचं उत्तर आहे असं काही होणार नाही. यामागचं कारण नेमकं काय आहे आणि मग मानवी जीवनाला नेमकी कोणती समस्या भेडसावू शकते? याबद्दल जाणून घेऊयात.

Earth without trees

झाडं जर गायब झाली तर सर्वात आधी झाडांवर अवलंबून असलेली इकोसिस्टम प्रभावित होईल यामध्ये कोणताही वाद नाही. फळं, बिया अशी झाडांवर अवलंबून असलेली साखळी नष्ट होईल. त्याचा फटका शाकाहारी प्राण्यांनाही बसेल. या सगळ्याचा फटका प्राण्यांसोबत मानवी जीवनावरही झाल्याशिवाय राहील. झाडांमुळेच माती एकाजागी टीकून राहते. पावसाचे पाणी जमिनीखाली साठवून ठेवण्यातही झाडांची महत्त्वाची भूमिका बजावतात. झाडे गायब झाली तर पाण्याचे स्त्रोत कमी होतील.

Earth without trees

दरम्यान झाडं गायब झाली तर मानवी जीवनाला तत्काळ काही धोका निर्माण होणार नाही. कारण वातावरणात ऑक्सिजनचा मोठा साठा उपलब्ध आहे. याशिवाय महासागरामधील फायटोप्लँक्टन पृथ्वीवरील अर्ध्यावरुन अधिक ऑक्सिजन तयार करते. दरम्यान, झाडं ही कार्बन डायऑक्साइड शोषून घेणारे मुख्य स्त्रोत आहेत. त्यामुळे त्यावरही ही झालं अचानक गायब झाली तर नक्कीच त्याचा परिणाम दिसून येईल. झाडं नसल्याने वायुमंडळात कार्बन डायऑक्साइडची पातळी वाढेल. त्यामुळे जागतिक पातळीवर परिणाम होईल आणि तापमानात वाढ होईल.

Earth without trees

कार्बन डायऑक्साइडची पातळी वाढल्यानंतर जंगलं आणि हवामान नियंत्रित करण्याची क्षमता गमावतात. त्यामुळे तापमान धोक्याची सीमा ओलांडू शकते. काही भागांमध्ये 50-60 अंशांच्या पार जाऊ शकते. त्यामुळे उष्णता वाढेल. कार्बन डायऑक्साइडमुळे होणारा परिणाम पाहता मानवी जीवनालाही फटका बसेल. विविध विकार अन् हवामानाशी संबंधित आजार वाढतील. अन्नटंचाईमुळे लोकसंख्येवर ताण येईल त्याचाही परिणाम पाहायला मिळेल.

Earth without trees

त्याचबरोबर पर्जन्यमानात समस्या निर्माण होईल. कालांतराने यामुळे पृथ्वीचा मोठा भाग कोरडा आणि ओसाड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे या सर्व गोष्टींवर मात करण्याची क्षमता किंवा तंत्रज्ञान असेल तेच या पृथ्वीवर जास्तीत जास्त काळ जिवंत राहू शकतात. कृत्रीम परिसंस्था मानवी जीवनाला कदाचित बचावू शकते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • माऊंट एव्हरेस्टवर गिर्यारोहकांची लघवी ठरली घातक ?, ग्लेशियर वितळण्यास जबाबदार ?
  • 6 September Horoscope : पैसा, नोकरी, घर, सगळंच मिळणार, या चार राशींसाठी आजचा दिवस खास!
  • 6 September Horoscope : पैसा, नोकरी, घर, सगळंच मिळणार, या चार राशींसाठी आजचा दिवस खास!
  • पोटात डुकराची किडनी, तरी डायलिसीस शिवाय जगला नऊ महिने, नंतर मिळाली मानवी किडनी…
  • IND W vs PAK W : 27वर 1 विकेट अन् 55वर ऑलआऊट; टीम इंडियाने पाकिस्तानची हवाच काढली, आशिया कपमध्ये विजयाची हॅटट्रिक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in