• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026: ऋषभ पंतचं कर्णधारपद गेलं, लखनौ सुपर जायंट्सने जाहीरपणे सांगितलं की…

May 29, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सची कामगिरी निराशाजनक राहिली. या स्पर्धेत फक्त चार सामन्यात विजय मिळवण्यात यश आलं. यासह गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर समाधान मानावं लागलं. त्यामुळे लखनौ सुपर जायंट्सचं सर्व गणितं चुकली असं म्हणावं लागेल. ऋषभ पंतच्या नेतृत्वात लखनौ सुपर जायंट्स संघाची हाराकिरी झाली. ऋषभ पंतने या स्पर्धेतील 14 सामन्यात 28.3 च्या सरासरीने 312 धावा केल्या. या पर्वात त्याने फक्त एक अर्धशतक ठोकलं आणि त्याचा स्ट्राईक रेटही 140 पेक्षा कमी होता. त्यामुळे लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल 2027 स्पर्धेपूर्वीच ऋषभ पंतला कर्णधारपदावरून काढल्याची घोषणा केली आहे. लखनौ सुपर जायंट्सने सोशल मीडियावर पोस्ट करून याबाबतची माहिती आहे. आता ऋषभ पंत फ्रेंचायझीसोबत असणार की नाही याबाबत अस्पष्टता आहे.

लखनौ सुपर जायंट्सने सोशल मीडियावर पोस्ट केली की, “लखनौ सुपर जायंट्स औपचारिकपणे जाहीर करते की ऋषभ पंतने फ्रँचायझीचे कर्णधारपद सोडण्याची विनंती केली आहे. फ्रँचायझीने त्याची विनंती तात्काळ प्रभावाने स्वीकारली आहे. एलएसजी व्यवस्थापन कर्णधार म्हणून ऋषभ पंतच्या योगदानाची प्रशंसा करते आणि त्याच्या नेतृत्वासाठी व संघाप्रती असलेल्या समर्पणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करते.”

Official announcement. pic.twitter.com/7WeOwpkDr6

— Lucknow Super Giants (@LucknowIPL) May 29, 2026

लखनौ सुपर जायंट्सचे क्रिकेट संचालक टॉम मूडी सांगितलं की, “ऋषभने या संदर्भात फ्रँचायझीशी संपर्क साधला आणि आम्ही आदराने त्याची विनंती स्वीकारली आहे. असे निर्णय घेणे कधीच सोपे नसते. कर्णधार म्हणून ऋषभने या ड्रेसिंग रूमसाठी दिलेल्या योगदानाबद्दल आम्ही त्याचे आभारी आहोत. आता आमचे लक्ष संघाची एकत्रितपणे पुनर्बांधणी आणि पुनर्रचना करून सर्वोत्तम दर्जा गाठण्यावर आहे.”

ऋषभ पंतला मेगा लिलावात लखनौ सुपर जायंट्सने 27 कोटी रूपयांची बोली लावून संघात घेतलं होतं. तसेच त्याच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा टाकली होती. मागच्या पर्वातही संघाची कामगिरी काही विशेष राहिली नाही. यंदा काही तरी वेगळं करेल असं वाटलं होतं. पण यंदाच्या पर्वातही तशीच कामगिरी राहिली. त्यामुळे 27 कोटींच्या या खेळाडूला संघ रिलीज करणार का? असा प्रश्न आहे. कारण संघाची पुर्नबांधणी करायची पर्समध्ये पैसे असणं आवश्यक आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? मनोज जरांगेंसोबत सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा
  • रुपाली चाकणकर बदनामी प्रकरणात मोठी कारवाई, दिपाली सय्यद, अंधारे यांच्यासह 19 जणांविरोधात गुन्हा दाखल!
  • रक्षाबंधनावर आधारित सुपरहिट गाणं, 43 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट, आशा भोसले यांनी दिलेला आवाज
  • Abhijit Dipke : अभिजीत दीपकेंचा मोठ्या बैठकीपूर्वीच सरकारला थेट इशारा, म्हणाला, पुन्हा अशी चूक…
  • खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी थेट खात्यावर पडणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in