• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs ZIM: भारताला त्याचा फायदा झाला म्हणून ते जिंकले, नाही तर आम्ही जिंकलो असतो… पराभवानंतर सिकंदर रझा असा का म्हणाला?

July 24, 2026 by admin Leave a Comment


झिम्बाब्वेला मायदेशात टीम इंडियाकडून पराभव पत्करावा लागला. झिम्बाब्वेचे फलंदाज भारतीय गोलंदाजांना प्रत्युत्तर देऊ शकले नाहीत. झिम्बाब्वे 20 षटकांत केवळ  125 धावाच करू शकले, तर वैभव सूर्यवंशीच्या स्फोटक खेळीने भारताला सहज विजय मिळवून दिला. अखेर भारतीय संघाला खूप दिवसांनंतर टी-20 सामना जिंकण्यात यश मिळाले.  कर्णधार श्रेयस अय्यरला कॅप्टन म्हणून पहिला टी-20 सामना जिंकता आला. मात्र, या पराभवानंतर झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा निराश झाला आणि त्याने पराभवाची कारणे सांगितली.

टीम इंडियाचा कर्णधार श्रेयस अय्यरने पदभार स्वीकारल्यापासून नाणेफेक गमावलेली नाही. अय्यरने सलग आठव्या सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला, खेळपट्टीने टीम इंडियाचे वेगवान गोलंदाज मयंक यादव आणि प्रिन्स यादव यांना मदत केली, ज्यामुळे झिम्बाब्वेच्या फलंदाजांना मोकळेपणाने खेळता आले नाही. पराभवानंतर झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा म्हणाला की, “खेळपट्टी अपेक्षेप्रमाणे नव्हती आणि सकाळच्या सत्रात ओलाव्याचा परिणाम स्पष्टपणे दिसून येत होता. सुरुवातीला चौकार न लागल्याने चेंडू नवीनच राहिला आणि विकेट्स पडत राहिल्या.”

सिकंदर रझाच्या विधानावरून हे स्पष्ट होते की खेळपट्टी भारतीय वेगवान गोलंदाजांना अनुकूल होती आणि दोन वर्षांनंतर पुनरागमन करणाऱ्या मयंक यादवने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली. यामुळे तो भारतासाठी टी- 20 आंतरराष्ट्रीय सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर दोन विकेट्स घेणारा चौथा गोलंदाज ठरला. मयंकने चार षटकांत 18 धावा देऊन दोन विकेट्स घेतल्या आणि प्रिन्स यादवनेही चार षटकांत 19 धावा देऊन दोन विकेट्स घेत झिम्बाब्वेला 125 धावांवर रोखले.

झिम्बाब्वेविरुद्ध 126 धावांचा पाठलाग करताना, टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशीने चार चौकार आणि चार षटकारांसह 19 चेंडूंमध्ये 50 धावांची वेगवान खेळी केली. यामुळे तो वयाच्या 15 वर्षे आणि 118 दिवसांत टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अर्धशतक झळकावणारा जगातील पहिला फलंदाज ठरला. वैभवच्या खेळीमुळे सामना सोपा झाला आणि श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली सहा टी- 20 सामने गमावल्यानंतर भारताने आपला पहिला विजय मिळवला. आता दुसरा सामना उद्या रंगणार आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Devendra Fadnavis : मराठी शिकण्यास रिक्षाचालकांना मुदतवाढ, सरनाईकांचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी फिरवला
  • स्वीमिंग पूल, जिम, स्पा, हेलिपॅड आणि… घर नव्हे महालात राहतो हा उद्योगपती, अंबानींपेक्षाही …
  • अरे ट्रॅफिक सोडा तो… का अडवून धरलाय…मुख्यमंत्री साहेबांचा आदेश येताच तारांबळ; नेमकं काय घडलं?
  • पुन्हा हुंडाबळी; पिंपरी चिंचवडमध्ये उच्चभ्रु कुटुंबातील विवाहितेचा संशयास्पद मृत्यू, सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप
  • रिक्षा चालकांना मराठी शिकण्यासाठी आता एक वर्षांची मुदत; शिंदेंच्या मंत्र्यांचा निर्णय फडणवीसांनी फिरवला, प्रताप सरनाईक यांची पहिली प्रतिक्रिया

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in