
भारतआणि इंग्लंड यांच्यात टी-20 मालिका आणि वनडे मालिका खेळवली गेली. एकही टी-20 सामना तर भारतीय संघाला जिंकता आला नाही, आणि फक्त एकच वनडे सामना जिंकण्यात भारतीय संघाला यश आले. भारतीय संघ सध्या तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेसाठी झिम्बाब्वेमध्ये आहे. पहिला सामना 23 जुलै रोजी हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळला जाईल. या मालिकेसाठी अनेक भारतीय खेळाडू झिम्बाब्वेमध्ये दाखल झाले असून त्यांनी सरावाला सुरुवात केली आहे. आता भारतीय संघ झिम्बाब्वेविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत मालिका जिंकता यावी य़ा इच्छेनेच मैदानात उतरतील.
कर्णधार श्रेयस अय्यरसह, इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत नुकतेच खेळलेले काही खेळाडूही लवकरच संघात सामील होतील. हरारे स्पोर्ट्स क्लबमधील सराव सत्रात भारतीय खेळाडू जोमाने सराव करताना पाहायला मिळाले. व्हीव्हीएस लक्ष्मण झिम्बाब्वे दौऱ्यावर भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत. खेळाडूंनी त्यांच्या देखरेखीखाली सराव केला. वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा हे दोन तरुण खेळाडू फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हींचा सराव करताना दिसले. रिंकू सिंगनेही त्यांच्यासोबत गोलंदाजीचा सराव केला. प्रशिक्षक लक्ष्मण यांनी क्षेत्ररक्षणावर विशेष लक्ष दिले आणि झेल घेण्याच्या सरावात खेळाडूंना वैयक्तिकरित्या मार्गदर्शन केले. बीसीसीआयने आपल्या सोशल मीडिया पेजवर या सत्राचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.
Hitting the ground running in Harare
Snippets from #TeamIndia‘s first training session ahead of the #ZIMvIND T20I series
pic.twitter.com/ErTaDWBugB
— BCCI (@BCCI) July 21, 2026
टी-20 फॉरमॅटमध्ये भारतीय संघाची अलीकडील कामगिरी निराशाजनक राहिली आहे. टीम इंडियाने यापूर्वी आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिका खेळल्या आहेत. इंग्लंडमध्ये टीम इंडियाने पाच टी-20 सामने खेळले, त्यापैकी चार सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. एक सामना पावसामुळे रद्द झाला. आयर्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेतही भारतीय संघ 2-0 ने पराभूत झाला. गेल्या सात सामन्यांमध्ये टीम इंडियाला सहा सामन्यांत पराभव पत्करावा लागला असून, एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे.
आयर्लंड मालिकेपूर्वी श्रेयस अय्यरची भारतीय टी-20 संघाचा नवीन कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. भारतीय संघ टी-20 मध्ये आपली चांगली कामगिरी कायम ठेवेल अशी आशा होती, पण तसे घडले नाही. श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदाखाली टीम इंडियाला अद्याप एकही सामना जिंकता आलेला नाही. त्यामुळे, भारतीय संघ आता झिम्बाब्वे दौऱ्यावर ही पराभवाची मालिका संपवण्याचा प्रयत्न करेल. या मालिकेतही पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वैभव सूर्यवंशीवर असेल.

Snippets from
Leave a Reply