
भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेत दोन कसोटी सामने रंगणार आहेत. या कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी भारतीय संघाला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. यात एक मोठी समस्या म्हणजे दुखापतींचा डोंगर. भारतीय खेळाडू एकामागोमाग दुखापतींचा सामना करत असल्याचे पाहायला मिळाले. आधी जसप्रीत बुमराह आणि नंतर साई सुदर्शनला दुखापतीचा सामना करावा लागला. हे दोन्ही खेळाडू आता मालिकेतून बाहेर पडले आहेत. भारतीय संघ अनेक जखमी खेळाडूंमुळे त्रस्त आहे. फलंदाज साई सुदर्शन दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या बदली खेळाडूबाबत एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. संघात साई सुदर्शनच्या जागी सरफराज खानला संधी मिळण्याची शक्यता आहे. सरफराज बऱ्याच काळापासून संघाबाहेर आहे, पण आता त्याचे नशीब बदलताना दिसत आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, साई सुदर्शनच्या दुखापतीमुळे आगामी कसोटी मालिकेत त्याच्या जागी सरफराज खानला संधी मिळण्याची शक्यता आहे. संघातील बदलांबाबतचा अंतिम निर्णय बीसीसीआयकडून अधिकृतपणे घेतला जाईल. बीसीसीआयच्या एका सूत्राने ही माहिती दिली. साई सुदर्शन सध्या बंगळूरु येथील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पुनर्वसन उपचार घेत आहे. त्याने फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या सरावात भाग घेतला आहे, परंतु असे मानले जाते की तो पहिल्या कसोटीसाठी पूर्णपणे तंदुरुस्त होणार नाही. भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना 15 ऑगस्टपासून गॉल येथे खेळवला जाणार आहे. सुदर्शन संघासोबत श्रीलंकेला गेला नाही आणि 8 ऑगस्टपासून कोलंबो येथे श्रीलंका क्रिकेट इलेव्हनविरुद्ध सुरू झालेल्या तीन दिवसीय सराव सामन्यातही त्याने भाग घेतला नाही.
भारतीय संघाच्या अडचणी केवळ सुदर्शनपुरत्या मर्यादित नाहीत. सराव सत्रादरम्यान उजव्या हाताच्या दुखापत झाल्याने कर्णधार शुभमन गिलदेखील वैद्यकीय देखरेखेखाली आहे. बीसीसीआयने सांगितले की, खबरदारीचा उपाय म्हणून गिल सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी मैदानात उतरणार नाही. गिलच्या अनुपस्थितीत केएल राहुल संघाचे नेतृत्व करत आहे. तथापि, वैद्यकीय पथक सध्या गिलच्या दुखापतीची तीव्रता आणि तो पहिल्या कसोटीसाठी पूर्णपणे तंदुरुस्त होईल की नाही यावर लक्ष ठेवून आहे.
Leave a Reply