• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Govinda Song: गोविंदा आणि मीनाक्षी शेषाद्रीचे गाणे, 33 वर्षांनंतरही ठरतेय हिट

August 12, 2026 by admin Leave a Comment


अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री यांनी बुधवारी सोशल मीडियाद्वारे चित्रपट ‘आदमी खिलौना है’च्या शूटींगच्या वेळची आठवण करुन दिली आहे. अभिनेत्रीने या पोस्टद्वारे चित्रपटात चित्रित केलेल्या ‘बहुत जताते हो, चाह हमसे’ या गाण्यामागील कहाणी सांगितली. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट केला, ज्यात त्या ‘बहुत जताते हो, चाह हमसे’ या गाण्यावर डान्स करत आहेत.

व्हिडिओमध्ये अभिनेत्री उत्कृष्ट हावभाव आणि डान्स करताना दिसत आहेत. अभिनेत्रीने व्हिडिओ पोस्ट करून, “हे खूपच सुंदर रोमँटिक गाणे आहे. हे गाणे माझा चित्रपट ‘आदमी खिलौना है’मधले आहे. महाबळेश्वरच्या सुंदर दऱ्याखोऱ्यांत हे गाणे चित्रित करण्यात आले होते. नदीम-श्रवण यांचे हे गीत खूप आवडले. ते पुन्हा चित्रित करण्यात खूप मजा आली” असे कॅप्शन दिले आहे.

33 वर्षांनंतही गाण्याची क्रेझ कायम

अभिनेत्रीच्या या व्हिडिओने फॅन्सना जुन्या दिवसांची आठवण करून दिली. ‘बहुत जताते हो, चाह हमसे’ या गाण्याबद्दल बोलायचे झाले तर हे १९९३ सालच्या बॉलिवूड चित्रपट ‘आदमी खिलौना है’चे एक अत्यंत प्रसिद्ध रोमँटिक गाणे आहे. या गाण्याला प्रसिद्ध गायक मोहम्मद अझीज आणि अल्का याग्निक यांनी आवाज दिला होता आणि त्याचे बोल समीर यांनी लिहिले होते. याचे संगीत नदीम-श्रवण या प्रसिद्ध जोडीने तयार केले होते. हे गाणे प्रेम, आपुलकी आणि मनात दडलेल्या भावना व्यक्त करते. त्याचे बोल प्रेमी-प्रेयसीमधील गोड भावना, तक्रार आणि एकमेकांसोबत जगण्याची प्रतिबद्धता दर्शवतात. ९० च्या दशकातील हे मेलोडी सॉन्ग आजही मधूर संगीतासाठी आवडते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Meenakshi Seshadri (@iammeenakshiseshadri)

काय आहे चित्रपटाची कथा?

१९९३ मध्ये रिलीज झालेल्या कौटुंबिक आणि भावनिक हिंदी ड्रामा चित्रपट ‘आदमी खिलौना है’चे दिग्दर्शन जे. ओम प्रकाश यांनी केले होते. संगीत नदीम-श्रवण यांनी दिले होते. या चित्रपटात जितेंद्र, गोविंदा, रीना रॉय आणि मीनाक्षी शेषाद्री यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटाची कहाणी कौटुंबिक त्याग आणि नात्यांच्या गुंत्यात आधारित आहे. विजय (जितेंद्र) आणि गंगा (रीना रॉय) हे एक सुखी जोडपे आहेत जे विजयचा धाकटा भाऊ शरद (गोविंदा) सोबत राहतात. जेव्हा हे समजते की शरदची पत्नी पूनम (मीनाक्षी शेषाद्री) मूल जन्माला घालू शकत नाही, तेव्हा गंगा एक मोठा त्याग करते आणि आपले मूल पूनमला देऊन टाकते. त्यानंतर कुटुंबात सुरू होणाऱ्या भावनिक चढ-उतार आणि गैरसमजुतींची कहाणीच या चित्रपटाचा मुख्य सार आहे.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in