
Rahul Gandhi Press COnference : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारला पुन्हा एकदा आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. सीजेपीच्या नेतृत्त्वात दिल्लीमध्ये झालेल्या आंदोलनात पोलिसांनी आंदोलक तरुणांवर अमानुष अत्याचार केला, असा दावा राहुल गांधी यांनी केला. पोलिसांनी निर्घृणपणे तरुणांना मारहाण केली, तरुणांना रोखण्यासाठी पॅलेट गनचा वापर केला गेला,असंही राहुल गांधी पुन्हा एकदा म्हणाले. यावेळी त्यांनी या आंदोलनात सहभागी झालेल्या आणि पोलिसांच्या लाठीमारात जखमी झालेल्या तरुण-तरुणींना माध्यमांसमोर उभं केलं. या तरुणांनीच माध्यमांना आमच्यासोबत काय घडलं? पोलिसांनी कसा अत्याचार केला, याची हकिकत सांगितली. मुस्कान शर्मा नावाच्या तरुणीने केलेल्या दाव्यानंतर तर देशात एकच खळबळ उडाली आहे.
राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत अगोदर पोलिसी अत्याचारावर भाष्य केलं. त्यानंतर तिथे आलेल्या तरुणांनी एक-एक करून त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं? याची माहिती दिली. यावेळी मुस्कान शर्मा नावाच्या तरुणीनने पुढे येत पोलिसांनी तिच्यावर केलेल्या लाठीचार्जबाबत माहिती दिली. माझं नाव मुस्कान आहे. दिल्लीच्या जंतर-मंतरवर शांततेत आंदोलन करणाऱ्यांमध्ये मी देखील सहभागी झालेली होती. मी जेव्हा शांततेत चालत होते, तेव्हा पोलिसांनी मला का मारलं? आरएएफ ऑफिसने माझ्यावर लाठीचार्ज का केला? असा सवाल मुस्कान शर्माने केला.
माझ्या प्रायव्हेट पार्टवर…
तसेच, लाठीचार्ज करताना तुम्ही मांड्यांच्या वर मारू शकत नाही. एक पुरुष ऑफिसर महिला आंदोलकांना मारू शकत नाही, असे नियम आहेत. असे असताना एका पुरुष आरएफ ऑफिसरने माझ्या प्रायव्हेट पार्टवर मारण्याचा प्रयत्न केला. हे कृत्य करण्यासाठी संबंधित ऑफिसरला ज्याने आदेश दिले, त्याने येऊन मला माफी मागितली तर मला समाधान वाटेल, असी मागणीही तिने केली.
प्रत्येकालाच मी मुस्लीम असल्याचे वाटते
पुढे बोलताना, माझे आडनाव शर्मा असे आहे. माझे नाव मुस्कान असल्याने प्रत्येकालाच मी मुस्लीम असल्याचे वाटते. त्यामुळं मला जास्तच शिव्या दिल्या जात आहेत, अशी खंत व्यक्त करत सरकारविरोधात बोललं की ही व्यक्ती तर मुस्लीम आहे, असा नेरेटिव्ह देशात सध्या पसवरवले जात आहे, त्याचेच हे एक उदाहरण आहे. एखादी व्यक्ती मुस्लीम असेल तर ती देशद्रोही ठरवू शकतो, असा सवालही संबंधित तरुणीने उपस्थित केला.
Leave a Reply