• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

CJP Protest: सरकारचा काय होता प्लॅन? आंदोलनाला गालबोट लागल्यानंतर अभिजित दिपके यांचा मोठा आरोप काय?

July 21, 2026 by admin Leave a Comment


Abhijeet Dipke big Allegation on Modi Government: काल काँक्रोच जनता पार्टीने संसदेकडे मार्चचे नियोजन केले होते. या आंदोलनाला हिंसक वळण लागले. सरकारने अत्यंत क्रूरपणे आंदोलकांवर लाठीचार्ज केला. 12-14 वर्षांच्या मुलींवर लाठीहल्ला केला. अत्यंत अमानुषपणे लाठीचार्ज केल्याचा आरोप अभिजीत दिपके यांनी केला. आज सकाळी त्यांनी जंतर मंतरवर माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी पत्रकार परिषदेत सरकारवर गंभीर आरोप केले. हे सरकार आपल्याच विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करत असल्यावरून त्यांनी संताप व्यक्त केला. तर यावेळी सरकारच्या हेतूवरही दिपके यांनी संशय व्यक्त केला.

शंभरहून अधिक आंदोलक जखमी

लहान मुलं आहेत. शाळा कॉलेजातील मुलं आहेत. १७-१८ वर्षाची आहेत. एक महिन्यापासून आम्ही आंदोलन करतोय. काही झालं नाही. काल दिल्ली पोलिसांमुळे हल्ला झाला. त्यांनी लाठी हल्ला केला. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. एका मुलीला जबर मारलं. या मुलीला काही झालं तर त्याला मोदी आणि प्रधान जबाबदार असेल. १५० मुलं जखमी झाले आहेत. मी रुग्णालयात जाऊन पाहिलं. मोदींच्या आदेशाने दिल्ली पोलिसांनी हल्ला केला, असा आरोप अभिजीत दिपके यांनी केला आहे.

वांगचुक यांचे उपोषण सुरूच राहणार

दगडांचे ट्रक कुठून आले. आमच्या प्रत्येकाच्या बॅगा चेक केल्या जात आहे. बॅरिकेड्स लावले आहेत. पक्षीही आत शिरू शकत नाही. मग ट्रक कुठून आले. पोलिसांनी प्लान केला आहे. काल सिव्हिल ड्रेसमध्ये लोक आले. त्यांच्या हातात पोलिसांनी दांडके दिले. नेम प्लेट हटवून मारहाण केली. काल वांगचुक उपोषण सोडणार होते. आम्ही त्यांना कन्व्हिन्स केलं होतं. त्यांची देशाला गरज आहे हे सांगितलं. त्यांनी ऐकलं. पण काल मुलांना ज्या पद्धतीने मारहाण झाली. त्यामुळे वागंचुक यांनी उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती अभिजीत दिपके यांनी केली आहे.

वांगचुक यांच्याशी माझी चर्चा झाली. डॉक्टर आणि वांगचुक यांच्या पत्नीशीही बोललो. वांगचुक यांचं शरीर केवळ २०-२५ दिवसच उपोषण सुरू करू शकतं. तीन चार दिवसाने त्यांचे अवयव डॅमेज होऊ शकतं असं डॉक्टरांचं म्हणणं होतं. त्यांना परत उपोषण सुरू करावं लागलं हे दुर्देव आहे. पोलिसांनी ज्या क्रूरपणे मारहाण केली हे पाहून त्यांनी उपोषण सुरू केलं, असे दिपके म्हणाले.

काय होता सरकारचा प्लॅन?

आमचं धरणं आंदोलन सुरू राहील. आमच्या सोबत सरकारने टाइम वेस्ट केला. मागण्यांच्या चर्चेसाठी बोलावलं. बोलावून मोबाईल जप्त केले.मला एकटं पाडलं गेलं. त्यामुळे गोंधळ उडेल हा त्यांचा प्लान होता. आमचे सदस्य एकत्र राहू नये हा त्यांचा डाव होता, असा आरोप अभिजीत दिपके यांनी केला आहे. पाच तास नड्डा यांच्या घरी बसवून ठेवलं. नेम टॅग हटवून मुलांवर हल्ला केला. आता आम्ही चर्चेला जाणार नाही. त्यांना आमच्याकडे चर्चेला यावं लागेल, असे दिपके यांनी जाहीर केले आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
  • नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
  • नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
  • पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी
  • ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in