
‘सीआयडी’ या मालिकेत दयाची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता दयानंद शेट्टीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. या मुलाखतीत दयानंदने थेट मालिकेचं नाव घेतलं नसलं तरी त्याच्या प्रतिक्रियेवरून चाहत्यांना खात्री पटली की तो ‘तारक मेहता..’ या मालिकेबद्दलच बोलत आहे. याविषयी दया म्हणाला, “एक मालिका आहे, ज्याचा उल्लेख मी करणार नाही. कारण ती खूप लोकप्रिय विनोदी मालिका आहे. आपली अपेक्षा असते की एक विनोदी मालिका असल्यामुळे त्यांच्याकडे उत्तम विनोदबुद्धी असेल. कलाकार सेटवर पण एकमेकांसोबत हसत-खेळत असतील. पण सेटवर त्याच्या उलट वातावरण होतं. कलाकार एकमेकांकडे बघतही नव्हते आणि बोलतही नव्हते.”
Leave a Reply