• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Chanakya Niti : या सवयी अत्यंत धोकादायक, पुरुषांचं आयुष्य उद्ध्वस्त करतात, चाणक्य काय म्हणतात?

August 5, 2026 by admin Leave a Comment


आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील अनेकांना योग्य मार्ग दाखवण्याचं काम करतात. चाणक्य म्हणतात अशा काही सवयी असतात ज्या पुरुषांचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. या सवयींमुळे संसारचं वाटोळं होतं, त्यामुळे पुरुषांनी अशा सवयींचा वेळीच त्याग केला पाहिजे, त्यातच हीत आहे. चाणक्य आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हणतात आळस ही देखील याच सवयींपैकी एक सवय आहे. आळस हा माणसाचा सर्वात मोठा आणि धोकादायक शत्रू असतो. जो माणूस आपल्या आयुष्यात आळस करतो, त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. असा माणूस कधीही आपल्या आयुष्यात प्रगती करू शकत नाही, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात अशा कोणत्या सवयी आहेत, ज्यामुळे माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं, आणि चाणक्य काय म्हणतात? त्याबद्दल.

अंहकार – चाणक्य म्हणतात असा या जगात कोणीही शोधून सापडणार नाही, ज्याच्या मनात अंहकार नाही. परंतु जेव्हा तुमच्या मनातील अंहकार हा पीक पॉइंटला पोहोचतो, तेव्हा मात्र तुमची पीछेहाट व्हायला सुरुवात होते. अंहकारामध्ये माणूस एवढा आंधळा होतो, की काय चांगलं आणि काय वाईट याचं भानच त्याला रहात नाही. जो माणूस अंहकारी आहे, असा माणूस आपल्या हाताने आपलं वाटोळं करून घेतो, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

गरजेपेक्षा जास्त खर्च – चाणक्य म्हणतात ज्या व्यक्तीला आपल्या गरजेपेक्षा जास्त खर्च करण्याची सवय आहे, अशा व्यक्तीच्या हातात कधीही पैसा टिकत नाही. असा व्यक्ती कधीही पैसा बचत करत नाही. त्यामुळे संकट काळात अशा व्यक्तींच्या हातात पैसा शिल्लक नसतो, त्यामुळे जे पुरुष गरजेपेक्षा जास्त पैसा खर्च करतात ते हाताने संकट ओढून घेतात, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

वाईट संगत – चाणक्य म्हणतात जे पुरुष वाईट संगतीला लागतात, त्यांचा संसार उद्ध्वस्त होतो. त्यामुळे कधीही माणसाला वाईट संगत असू नये, आपण कोणाच्या संगतीत आहोत, हे आपण आयुष्य तपासून पाहिलं पाहिजे, असं चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in