• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Chanakya Niti : घरात कधीच होणार नाहीत भांडणं; येईल सुख, समृद्धी, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला

July 18, 2026 by admin Leave a Comment


आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये पती-पत्नीची कर्तव्य काय असतात? जबाबदाऱ्या काय असतात? घरातील कुटुंब प्रमुखाने इतर सदस्यांसोबत कसं वागावं? याबद्दल चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात पती-पत्नीला रथाच्या दोन चाकांची उपमा दिली जाते, जोपर्यंत रथाची दोन्ही चाके समान गतीने धावत आहेत, तोपर्यंत तो रथ व्यवस्थित चालतो, मात्र त्यातील एक चाक मागे किंवा पुढे झालं तर तो रथ धावणार नाही, तसंच संसाराचं देखील आहे. जोपर्यंत पती-पत्नीचा एकमेकांवर विश्वास आहे, एकमेकांना खंबीर साथ आहे, तोपर्यंत संसार सुरळीत सुरू राहणार, परंतु जर नात्यात प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, विश्वास नसेल तर असा संसार फार काळ टिकू शकत नाही, अशा घरात नेहमी सतत कलह होत राहतो, ज्याचा परिणाम हा त्या घरातील इतर सदस्यांवर आणि मुलांवर देखील होतो, असं चाणक्य यांनी सांगितलं आहे, तसेच गृहकलह टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी? याबद्दल देखील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

कुटुंब प्रमुखाची जबाबदारी – चाणक्य म्हणतात घरातील कुटुंब प्रमुख म्हणून व्यक्तीवर फार मोठी जबाबदारी असते. घरातील कुटुंब प्रमुख या नात्याने असा व्यक्ती त्याची पत्नी आणि घरातील इतर सदस्य यांना जोडणारा पूल असतो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये हा पूल ढासळता कामा नये. जर हा पूल ढासळला तर मात्र घरात सतत भांडणं होत राहातील, परंतु हा पूल जर मजबूत असेल तर मात्र घरात कधीही भांडणं होणार नाहीत, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

कुटुंबातील लोकांच्या गरजा – चाणक्य म्हणतात कुटुंब प्रमुख या नात्याने घरातील सदस्यांच्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी कुटुंब प्रमुखावर असते, घरातील सदस्यांना त्यांना हवे ते जर मिळाले, त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या तर असं कुटुंब कायम आनंदी राहतं, घरात सुख समृद्धी येते. घरातील इतर सदस्यांच्या मनात कुटुंबप्रमुखाबद्दल आदर वाढतो, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

पैसे – चाणक्य म्हणता कुटुंबप्रमुखाने किमान एवढा तरी पैसा कमावला पाहिजे, ज्यामधून आपल्या कुटुंबाच्या सर्व गरजा पूर्ण होतील, जर कुटुंब सुखी असेल तर अशा घरामध्ये कधीही वाद होत नाहीत.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Jalgaon | जळगावात ड्रग्जविरोधात मोठी कारवाई! 5 किलो MD पावडर जप्त, किंमत तब्बल 1.25 कोटी
  • MPSC पेपरफुटीत मोठा खुलासा! माजी विद्यार्थ्याच्या माध्यमातून फोडला पेपर? 5 लाखांचा व्यवहार अन् प्रकरण आलं समोर
  • वाढदिवशी GFला हॉटेल रुममध्ये नेलं, नंतर लैंगिक उत्तेजक औषध घेतलं अन्… भंयकर कृत्य
  • Vaibhav Sooryavanshi: भल्याभल्यांना जे जमलं नाही ते वैभवनं केलं, शतक हुकलं पण पठ्ठ्यानं रेकॉर्ड रचलाच
  • इंडस्ट्रीमध्ये महिलांना कोणत्या नजरेने पाहतात? प्रसिद्ध अभिनेत्रीकडून बॉलिवूडची पोलखोल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in