
टीम इंडियाचा युवा स्टार वैभव सूर्यवंशी सध्या चर्चेत आहे. त्याच्या आंतरराष्ट्रीय डेब्यूकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. आयर्लंड विरुद्ध वैभवला टीम इंडियाकडून आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळू शकते. अंडर-19, इंडिया ए कडून तो खेळला आहे. आयपीएलमधील दमदार कामगिरीच्या बळावर वैभव सूर्यवंशीने सिनियर टीम इंडियात स्थान मिळवलं आहे. वैभव सूर्यवंशीच जसं कौतुक होतय तसच श्रीलंकेतील त्याच्या वर्तनावर टीका सुद्धा झाली. दांबुलामध्ये श्रीलंकन अ संघातील खेळाडूंसोबत वैभव सूर्यवंशीची वादावादी झाली होती. त्यावरुन त्याच्यावर टीका करण्यात आली. भारताचा माजी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने या घटनेवर भाष्य करताना वैभव सूर्यवंशीचं समर्थन केलं आहे.
सुपर ओव्हरमध्ये भारतीय अ संघाचा पराभव झाल्यानंतर ही वादावादीची घटना घडली होती. चाहते आणि क्रिकेट एक्सपर्ट्स मध्ये यावर बरीच चर्चा झाली. अश्विनला वाटतं की गरजेपेक्षा जास्त चर्चा झाली. टीका करताना ती व्यक्तिगत होऊ नये असंही अश्विनचं मत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काय गरजेचं आहे, ते वैभव शिकतोय असं अश्विन म्हणाला. अश्विन त्याच्या युट्यूब शो मध्ये बोलत होता. त्या एका क्षणावरुन अनेकांनी वैभव सूर्यवंशीला टार्गेट केल्याबद्दल अश्विनला विचारण्यात आलं.
अश्विन टीकाकारांना काय म्हणाला?
“आपण तिरस्काराने बोलतो पण त्यानंतर काय होतं? आपण ज्याचा तिरस्कार करतोय त्याने या गोष्टी नंतर वाचल्या तर त्याच्यावर थोडाफार परिणाम होऊ शकतो. पण असं बोलून आपण काय मिळवणार आहोत?. म्हणूनच मी म्हणतोय तुम्ही वैभव सूर्यवंशीचा तिरस्कार कसा करु शकता?” असा सवाल अश्विनने केला. वैभव सूर्यवंशीकडून परिपक्तवेतची अपेक्षा करणाऱ्यांना सुद्धा अश्विनने सुनावलं. वैभव बद्दल कुठलही मत प्रगट करण्याआधी तु्म्ही त्याचं वय आणि अनुभव दोन्ही लक्षात घ्या असं अश्विन टीकाकारांना म्हणाला.
आपणही कधीकाळी मुलं होतो?
“तुम्ही मला सांगा, तुम्ही त्याचा कसा द्वेष करु शकता. सगळे बोलतायत की, त्याने परिपक्तवता दाखवावी. अजून परिपक्वतेने त्याने बोललं पाहिजे. आपण हे विसरतोय का, की आपणही कधीकाळी मुलं होतो? आपल्या कुटुंबातही वैभव सारखी मुलं आहेत हे आपण विसरतो का?. हा खूप भयानक ट्रेंड आहे” असं अश्विन बोलला.
Leave a Reply