
अमृता फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. सणासुदीचे दिवस लक्षात घेता जरांगे पाटील जे काही करतील ते शांततापूर्वकच करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मराठा आरक्षणाचा मुद्दा अत्यंत संवेदनशील असून राज्य सरकार यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे फडणवीस म्हणाल्या.
याआधी मनोज जरांगे पाटील यांनी महिलांना लता शिंदे आणि अमृता फडणवीस यांच्या घरी जाऊन हळदी-कुंकू कार्यक्रम करण्याचे आवाहन केले होते. आरक्षण मिळावे, अशी मागणी करत हळदी-कुंकू लावावे, असेही ते म्हणाले होते. जरांगे पाटील यांच्या या आवाहनावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत, त्यांचा भाऊ शांतता राखूनच काम करेल अशी अपेक्षा व्यक्त केली. राज्य सरकारकडून मराठा आरक्षणावर लवकरात लवकर उपाय शोधला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
Leave a Reply