• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Abhijeet Dipke यांनी आंदोलनात सातत्य ठेवलं, हे यश त्यांचं आहे, रोहित पवार म्हणाले….

July 26, 2026 by admin Leave a Comment


NEET पेपर लिकच्या प्रकरणात विद्यार्थ्यांना एकत्र जोडणे हा या आंदोलनाचा परिपाक होता. सरकारच्या विरोधातला लढा आपण सगळ्यांनी एकत्र येऊन लढला आहे. अभिजीत दिपके यांनी आंदोलनात सातत्य ठेवलं आणि त्यांना पाठिंबा वाढत गेला. पोलिसांनी दिल्लीत लाठीचार्ज केला आणि नंतर अख्खा देश एक झाला आणि त्या एकीचा विजय काल आपल्याला पाहायला मिळाला. अभिजीत दिपके यांच्यासोबत फोनवरून सतत चर्चा करत होतो. हा लढा कुठल्याही राजकीय पक्षांनी लढलेला नाही, सामान्य घरातल्या मुलांनी एकत्रित येऊन लढलेला हा लढा आहे असे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.

हा लढा विद्यार्थ्यांचा होता त्यानंतर विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला. भाजपातले काही नेते आणि त्यांची ट्रॉलिंग टीमचा भ्रमनिरास झाला आहे. ही दहा पैशांची टीम कशी काम करते याचा अभ्यास मला आहे. जर राजकीय नेते व्यासपीठावर दिसले असते तर भाजपने आंदोलनाला वेगळा रंग दिला असता असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.

तुम्ही त्यांचा इगो हर्ट केला

अंधभक्तांचा अहंकार काल तुम्ही सगळ्यांनी मोडला आहे. आंदोलन राजकीय होऊ नये म्हणून आम्ही आधी त्या आंदोलनात गेलो नाही. आता कुठलाही विचार न करता पुढ जायचं आहे. तुम्ही लोकांनी ठरवलं म्हणून आपल्याला विजय मिळाला. या आंदोलनाने सत्ताधारी लोकांचा अहंकार मोडला आहे. तुम्ही त्यांचा इगो हर्ट केला आहे असे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.

लोक न घाबरता लढायला तयार

अनेक लोक विचार करत होते की लढू की नको ? आमच्या भोवती ईडी लागली, पण आम्ही कुणाला घाबरत नाही. तुम्ही सगळे भारतीय म्हणून एकत्र आलात.  जाती धर्माच्या पलीकडे जाऊन तुम्ही एक झालात. आता बरेच लोक रस्त्यावर येऊन न घाबरता लढायला तयार होतील. एका मंत्र्यांचा तुम्ही राजीनामा घेतला हे तुमचं यश आहे असेही रोहित पवार यांनी सांगितले.

पाऊस येतोय पण तुम्ही घाबरणार नाहीत, एवढ्या मोठ्या बलाढ्य शक्तीला तुम्ही घाबरला नाहीत तर पावसाला काय घाबराल. या आंदोलनामुळे एकी दिसली. दिल्लीत भारत आणि इंडिया एक झाला. यापुढे शेतकऱ्यांवर अन्याय झाला तरी एकत्रित या, मजुरांवर अन्याय झाला तरी एकत्रित या, मुलींंवर आणि महिलांवर अत्याचार झाला तरी एकत्रित या. आता ही तुमची जबाबदारी आहे असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

त्या विरोधात रस्त्यावर उतरावे लागणार

तुमची एकजूट राज्यकर्त्यांना इशारा देत आहे की नीट चाल नाहीतर आम्ही तुझ्याकडे बघून घेऊ. रस्त्यावरचा लढा आपण लढू शकतो. पुढच्या वेळी मतदान करा आणि कुणाला करायचं ते ठरवून करा. संविधानाच्या आणि लोकशाहीच्या विरोधात जो कोणी कार्य करेल त्याच्या विरोधात आपल्याला रस्त्यावर उतरावे लागणार आहे. आता आपल्यावर जबाबदारी वाढली आहे असेही रोहित पवार शेवटी म्हणाले आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • डोळ्यांची 85% दृष्टी गेली, तब्येत बिघडली… इम्रान खान यांची तुरुंगात बिकट अवस्था, मुलांनी केला खुलासा
  • आंतरजातीय विवाह करणारे होणार लखपती, सरकारची मोठी घोषणा, मिळणार इतके पैसे
  • MPSC Paper Leak : लव्ह स्टोरीमुळे फुटला MPSC चा पेपर, तपासातून धक्कादायक माहिती समोर
  • Khavdya Donger : खवड्या डोंगर प्रकरणात हैराण करणारा ट्विस्ट, कुणालला जीव द्यायचाच नव्हता? मोठं कारण आलं समोर
  • मुंबईकरांसाठी विशेष बातमी! मध्य रेल्वेवर शुक्रवारपासून सलग 15 दिवसांचा ब्लॉक, सर्वात मोठा बदल घडणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in