• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

7 व्या वर्षी सोडलं शिक्षण, 300 चित्रपटांमध्ये केलं काम, एकाच चित्रपटात साकारल्या 9 भूमिका, मृत्यूनंतरही या अभिनेत्याचा रेकॉर्ड कायम

July 23, 2026 by admin Leave a Comment


भारतीय चित्रपटसृष्टीतील महान अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे तमिळ अभिनेते शिवाजी गणेशन यांनी आपल्या दमदार अभिनयाने देशासह परदेशातही वेगळी ओळख निर्माण केली. गणेशन यांनी आपल्या कारकिर्दीत सुमारे 300 चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारत अभिनयाचा नवा आदर्श निर्माण केला.

1 ऑक्टोबर 1928 रोजी तामिळनाडूतील तंजावूर जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव विल्लुपुरम चिन्नैया पिल्लै गणेशमूर्ती असे होते. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना अवघ्या सातव्या वर्षी शिक्षण सोडावे लागले. लहानपणापासून अभिनयाची आवड असल्याने त्यांनी रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली.

1946 मध्ये एका नाटकात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली होती. त्यांच्या प्रभावी अभिनयाने प्रभावित होऊन द्रविड चळवळीचे नेते ई. व्ही. रामासामी ‘पेरियार’ यांनी त्यांना ‘शिवाजी’ हे नाव दिले. त्यानंतर ते ‘शिवाजी गणेशन’ म्हणूनच प्रसिद्ध झाले.

एकाच चित्रपटात साकारल्या 9 भूमिका

1952 मध्ये ‘पराशक्ति’ या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटाला मोठे यश मिळाले आणि त्यांच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले. हा चित्रपट तब्बल 175 दिवस चित्रपटगृहांत चालल्याचे सांगितले जाते.

शिवाजी गणेशन यांनी कौटुंबिक, ऐतिहासिक, पौराणिक, रोमँटिक, विनोदी, अॅक्शन आणि गुन्हेगारी अशा विविध प्रकारच्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ‘दैवा मगन’ हा त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा चित्रपट असून ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपट विभागासाठी भारताकडून पाठवला गेलेला पहिला तमिळ चित्रपट ठरला. तसेच ‘नवरात्री’ या चित्रपटात त्यांनी तब्बल नऊ वेगवेगळ्या भूमिका साकारून विक्रम केला.

72 व्या वर्षी निधन

त्यांच्या अभिनयाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली. अमेरिकेतील ‘लॉस एंजेलिस टाइम्स’ने त्यांना ‘दक्षिण भारताचा मार्लन ब्रँडो’ अशी उपमा दिली होती. 1960 मध्ये ‘वीरपांडिया कट्टाबोम्मन’ चित्रपटासाठी इजिप्तमध्ये झालेल्या Afro-Asian Film Festivalमध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिनयाचा मानाचा पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय अभिनेत्यांमध्ये त्यांचा समावेश झाला.

अभिनयासोबत त्यांनी काही काळ राजकारणातही सक्रिय सहभाग घेतला. मात्र, त्यांची खरी ओळख कायम त्यांच्या अप्रतिम अभिनयामुळेच राहिली. 21 जुलै 2001 रोजी वयाच्या 72 व्या वर्षी चेन्नई येथील अपोलो रुग्णालयात त्यांचे निधन झाले. भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान आजही प्रेरणादायी मानले जाते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL नंतर नेमकं काय झालेलं, पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर अभिनेत्रीच्या घरी का गेलेला? मोठं रहस्य समोर
  • मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
  • नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
  • नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
  • पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in