• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

40 वर्षांनंतरही मनाला चटका लावणारं गाणं, गायिकेला येत नव्हते लिहिता-वाचता, गाण्याचे पाकिस्तानमध्ये होते चाहते

June 27, 2026 by admin Leave a Comment


हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक अशी गाणी आहेत, जी काळाच्या ओघातही प्रेक्षकांच्या मनातून पुसली जात नाहीत. अपूर्ण प्रेम आणि आठवणींनी भरलेल्या गाण्यांचा विचार केला तर काही गाणी आजही तितकीच ताजी वाटतात. 1983 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हिरो’ या चित्रपटातील ‘लंबी जुदाई’ हे असेच एक अजरामर गाणं आहे. चार दशकांहून अधिक काळ लोटल्यानंतरही हे गाणे अग्रस्थानी आहे. मात्र या गाण्याच्या निर्मितीमागे अनेक रंजक आणि फारशा परिचित नसलेल्या आठवणी दडल्या आहेत.

‘लंबी जुदाई’ या गाण्याला आपल्या भावपूर्ण आवाजाने अमर करणाऱ्या प्रसिद्ध लोकगायिका रेशमा यांना हे गाणे गाण्याची संधी कशी मिळाली, याची कहाणीही तितकीच खास आहे. सांगितले जाते की, दिग्दर्शक सुभाष घई यांनी प्रथमच रेशमा यांचा आवाज राज कपूर यांच्या एका पार्टीत ऐकला होता. त्यांच्या आवाजातील वेदना, लोकसंगीताचा गोडवा आणि गायकीतील नैसर्गिकता पाहून ते इतके प्रभावित झाले की, त्यांनी त्याचवेळी आपल्या आगामी ‘हिरो’ चित्रपटासाठी त्यांना गाण्याची ऑफर दिली.

सुरुवातीला रेशमा यांनी दिला होता नकार

मात्र सुरुवातीला रेशमा या ऑफरसाठी तयार नव्हत्या. त्या प्रामुख्याने दर्गे, सूफी मेळावे आणि लोकसंगीताच्या कार्यक्रमांमध्ये गायन करत असत. स्टुडिओमध्ये बंद वातावरणात गाणे रेकॉर्ड करण्याची पद्धत त्यांच्यासाठी पूर्णपणे नवी होती. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला संकोच व्यक्त केला.

यानंतर सुभाष घई यांनी त्यांना विश्वास दिला की, त्यांच्या नैसर्गिक आवाजात किंवा गायनशैलीत कोणताही कृत्रिम बदल केला जाणार नाही. हा विश्वास मिळाल्यानंतर रेशमा यांनी हे गाणं रेकॉर्ड केले आणि पुढे ते हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वाधिक लोकप्रिय गाण्यांपैकी एक ठरले.

‘हिरो’च्या यशात गाण्याचाही मोठा वाटा

‘हिरो’ चित्रपटात जॅकी श्रॉफ आणि मीनाक्षी शेषाद्री यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटाला मिळालेल्या प्रचंड यशामध्ये ‘लंबी जुदाई’ या गाण्याचाही मोठा वाटा असल्याचे मानले जाते. या गाण्याला संगीतकार जोडी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी सुरेल संगीत दिले तर गीतकार आनंद बक्षी यांनी हृदयस्पर्शी शब्दांची रचना केली.

‘वाळवंटाची कोकिळा’ म्हणून मिळाली ओळख

रेशमा यांचा जन्म राजस्थानातील बीकानेर येथे एका बंजारा कुटुंबात झाला होता. त्यांच्या आवाजात लोकसंगीताची सहजता, वेदना आणि आत्मीयता यांचा अप्रतिम संगम होता. त्यामुळे ‘लंबी जुदाई’ या गाण्यानंतर त्यांना ‘वाळवंटाची कोकिळा’ अशी ओळख मिळाली. त्यांच्या गायकीने भारतासह पाकिस्तानमध्येही लाखो चाहत्यांची मने जिंकली.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ
  • Uric Acid problem: सांधेदुखीला कारण नॉनव्हेज?, रेड मीटने युरिक एसिडची पातळी वाढते, जाणून घ्या…
  • PM Kisan Yojana:… तर खात्यात 4,000 रुपये जमा होणार… ती चूक दुरुस्त केली का? पीएम किसान योजनेची मोठी अपडेट
  • ईद-ए-मिलाद मिरवणूकीनिमित्त मुंबईतील वाहतूकीत मोठा बदल, कोणते मार्ग बंद ते पाहा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in