• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

20 वर्ष लिव्ह इनमध्ये राहिलेली मराठमोळी अभिनेत्री, अखेर 60 व्या वर्षी Facebook फ्रेंडसोबत संसार थाटणारी ‘ती’ कोण?

June 18, 2026 by admin Leave a Comment


प्रेमाला कोणतीच बंधनं नसतात… वयाचंही बंधन नसतं आणि कोणच्या परवानगीची देखील गरज नसते… हवी असते तर फक्त दोघांना एकमेकांची साथ… हे सत्य करुन दाखवलं आहे, एका मराठमोठ्या अभिनेत्रीने… सिनेविश्वात अभिनेत्री यशाच्या शिखरावर तर पोहोचली, पण तिच्या खासगी आयुष्याच्या चर्चा देखील तुफान रंगलेल्या आणि आजही अभिनेत्रीचं खासगी आयुष्य चर्चेत असते. अभिनेत्री स्वतःपेक्षा 17 वर्ष लहान अभिनेत्यासोबत किसिंग सीन तर दिलाच पण अभिनेत्रीच्या टॉपलेस सीने सर्वत्र खळबळ उडाली होती… एवढंच नाही तर, अभिनेत्री खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत आली. 20 वर्ष एका पुरुषासोबत राहिल्यानंतर अभिनेत्रीचं ब्रेकअप झालं. त्यानंतर अभिनेत्रीने एका फेसबूक फ्रेंडसोबतच लग्न केलं. सध्या ज्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री सुहासिनी मुळे आहे. सुहासिनी ‘इक्किस’ सिनेमात दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांच्यासोबत देखील झळकले होते.

सुहासिनी यांच्या आई विजया मुळे एक फ्लिममेकर होत्या. ज्यामुळे सुहासिनी यांनी सिनेमात काम करण्याचा निर्णय घेतला. 1965 मध्ये जेव्हा सुहासिनी ‘पिअर्स’ (Pears) साबणाच्या जाहिरातीत झळकली, तेव्हा चित्रपट-दिग्दर्शक मृणाल सेन यांनी त्यांना पाहिलं आणि ‘भुवन शोम’ या सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारण्याची संधी दिली. त्यानंतर सुहासिनी यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.

सुहासिनी मुळे यांसारख्या अभिनेत्रींची तेव्हा सर्वत्र चर्चा रंगलेली असायची. कायम तेव्हा अभिनेत्रीने अभिनेते नसीरुद्दीन शाह स्टारर ‘यूं होता तो क्या होता’ सिनेमात टॉपलेस सीन देत सर्वांना थक्क केलं होतं.. एवढंच नाही तर, सुहासिनी यांनी 17 वर्ष लहान इमरान खान यांच्यासोबत किसिंग सीन देखील दिलेला. त्याकाळात सुहासिनी अत्यंत ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखल्या जात होत्या.

मोठ्या पडद्यावर सुहासिनी यांनी चाहत्यांचं मनोरंजन तर केलं. पण खासगी आयुष्यात त्यांनी अनेक चढ – उतारांचा सामना केला. तेव्हा सुहासिनी तब्बल 20 वर्ष लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होत्या. तेव्हा अशा नात्यांना भारतीय समाजाचा नकार असायचा… पण 1990 च्या अखेरीस त्यांचे ब्रेकअप झालं, त्यानंतर सुहासिनी यांची ओळख अतुल गुर्तू याच्यासोबत फेसबुकवर झाली. त्यानंतर दोघांमध्ये गप्पा सुरु झाल्या. अखेर अतुल यांचा अभिनेत्रीला एक फोन आला, ‘नाती बनवायची असतात, ती आकाशातून पडत नाहीत.’

अतुल आणि सुहासिनी यांनी काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. एका मुलाखतीत सुबासिनी म्हणालेल्या, ‘जेव्हा पंडितने विचारल नवरी – नवरा कोण आहे… तेव्हा आम्हाला दोघांना पाहून ते हैराण झाले. आम्हाला देखील हसायला आलं… कोर्टामध्ये देखील असंच काही झालं… पण आम्ही आनंदी होतो…’, आज सुहासिनीमुळे 75 वर्षांच्या आहेत आणि त्यांच्या आयुष्यात आनंदी आहेत.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ड्रग्स माफियांचे पाय लटलटले… सलीम डोळा ताब्यात… इतक्या कोटींचे ड्रग्ज जप्त… फडणवीस सरकार ॲक्शन मोडवर
  • 6 हजारांवरून थेट 358K फॉलोअर्स; ‘इंडियाज गॉट लेटेंट’मुळे अंबरनाथचा सुकृत देव बनला स्टार; आलिया भट्टही झाली फॅन
  • Ketan Agarwal Death : भर उन्हात एक चूक आणि पकडला आरोपी.. , पोलिसांनी कसं उलडगडलं केतनच्या हत्येचं गूढ ?
  • Sushma Andhare | निधी मिळत नाही हे कारण…तर निधी का दिला जात नाही? अंधारेंनी उघड केलं सत्य
  • बड्या नेत्याने दिला मंत्रिपदाचा राजिनामा! नेमकं कारण काय? राष्ट्रपतींनी तात्काळ…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in