
शुबमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडिया कसोटी मालिका खेळण्यासाठी उतरणार आहे. दोन सामन्यांची कसोटी मालिका खूपच महत्त्वाची आहे. नऊ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर टीम इंडिया श्रीलंकेत कसोटी मालिका खेळणार आहे. त्यात ही कसोटी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. (PHOTO CREDIT- PTI)
टीम इंडिया 16 वर्षात पहिल्यांदाच स्टार फलंदाज विराट कोहलीशिवाय श्रीलंकेत कसोटी मालिका खेळणार आहे. भारताने 2010 मध्ये विराट कोहलीशिवाय श्रीलंकेत कसोटी मालिका खेळली होती. तेव्हा विराट कोहलीचं कसोटीत पदार्पण झालं नव्हतं. (PHOTO CREDIT- AFP)
विराट कोहलीने कसोटी डेब्यू केल्यानंतर भारतीय संघाने श्रीलंकेत पाय ठेवला होता. तेव्हा विराट कोहली टीम इंडियाचा भागच नाही तर कर्णधारही होता. त्याच्या कार्यकाळात टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी केली. (PHOTO CREDIT- PTI)
विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने श्रीलंकेत सलग दोन कसोटी मालिका जिंकून इतिहास रचला होता. वर्ष 2015 मध्ये 2-1 मालिका जिंकली होती. तर 2017 मध्ये श्रीलंकेचा 3-0 ने क्लिन स्वीप दिला होता. (PHOTO CREDIT- PTI)
श्रीलंकन संघाने भारतीय संघाला त्यांच्याच भूमीत शेवटचं 2008 मध्ये पराभूत केलं होतं. आता 16 वर्षानंतर टीम इंडिया विजयाचा कित्ता पुन्हा गिरवणार का? की वेगळा निकाल असेल? हे पाहणं औत्सुक्याचं असेल. (PHOTO CREDIT- PTI)




Leave a Reply