
मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्ट पासून सुरु केलेले उपोषण आंदोलन आज सरकारचे मंत्री उपोषण स्थळी आल्यानंतरही मागे घेतलेले नाही. तुम्हाला मराठ्यासाठी ११ तारखेपर्यत जे काम करायचे ते करा, ११ तारखेपर्यंत आंदोलन काही थांबणार नाही. सरकार १० तारखेची वाट पहायला लावणार नाहीत अशी मला खात्री आहे. काम झाले तर गुलाल टाकायला मुंबईत जाऊ आणि शिरसाठ आणि बावनकुळेंवर जास्त गुलाल टाकू असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला अल्टीमेटम देत सांगितले आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply