• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

1 कोटीचे दान आणि 5 देशांच्या हिमालयीन बोर्डाचा प्रस्ताव, नेपाळ संकटानंतर सद्गुरुंचे मोठे पाऊल

August 31, 2026 by admin Leave a Comment


नेपाळ येथे आलेल्या भीषण आणि विनाशकारी पुरानंतर इशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरु जग्गी वासुदेव पहिल्यांदा सार्वजनिक रुपात समोर आले आहे. रविवारी काठमांडूत ‘नेपाळ सोबत एकजूट’ कार्यक्रमात त्यांनी नेपाळचे पंतप्रधान मदत निधी फंडात 1  कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. ते म्हणाले की हिमालयाच्या जवळ राहणाऱ्या देशांनी मिळून या नैसर्गिक संकटाचा सामना करायला हवा.

या पुराने आतापर्यंत ९०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर हजारो लोक बेपत्ता आहे. बेपत्ता लोकांमध्ये ईशाच्या कैलास यात्रेचे ७७ सदस्य देखील आहेत. ते अपघाताच्या वेळी चीनच्या बाजूने गियिरोंग इमिग्रेशन सेंटरवर होते. तसेच नेपाळच्या हद्दीतील तीन ईशाचे स्वयंसेवक बेपत्ता आहे. सद्गुरुंनी सल्ला दिला आहे की भारत, चीन, पाकिस्तान, नेपाल आणि भूतान यांनी मिळून एक हिमालयीन बोर्ड स्थापन करायला हवे.

हिमालय पृथ्वीचे सर्वात सुंदर ठिकाण – सद्गुरु

ते म्हणाले की या देशांनी आपल्या मर्यादेच्या वर उठून हिमालयाशी संबंधित असलेल्या समस्यांचा मिळून निपटारा केला पाहिजे. सद्गुरु म्हणाले की पर्वतांना तुमच्या राजकीय विचाराधारेशी काय संबंध नाही. त्यांना या गोष्टीची परवा नाही की तुम्ही कोणती भाषा बोलत आहात. भले आप यास एक साथ न चालवू शकलो तर किमान एक साथ बसून सल्ला -मसलत केली पाहिजे. आपल्या कामात ताळमेळ असायला हवा. कारण हिमालय पृथ्वीवर सर्वात सुंदर आणि भव्य वस्तू आहे.तसेच हा भाग नाजूकही आहे.

ते म्हणाले की एक अशी संस्था बनवली पाहिजेत ज्यात सर्व देशांनी सामील व्हावे ज्या देशात हिमालयाचे पर्वत पसरले आहेत. भलेही प्रत्येक देशाचे स्वतंत्र प्रशासन असो. पण या पर्वतांना भावी पिढ्यांसाठी जतन करण्यासारखी गोष्ट म्हणून ओळखले पाहिजे. जर आपण हे केले नाही आणि ही केवळ नेपाळची समस्या आहे आणि त्यांनीच ती हाताळावी असा विचार करत राहिलो, तर यावर कधीच तोडगा निघणार नाही.

 सद्गुरु यावेळी काय म्हणाले ?

ते म्हणाले की या संकटाचा परिणाम अपेक्षेपेक्षा कितीतरी पट मोठा होता. याचा निपटारा सर्वांनी करायला हवा. केवल नेपाळ याचा सांभाळ करु शकत नाही. कोणी विचारही केला नव्हता की ग्लेशियरचा तीन चतृर्थांश हिस्सा डोंगराच्या कड्यावरुन ४००० फूट खाली कोसळेल. अशा घटनेचा कोणताही अंदाज नव्हता. परंतू आता हे झाले आहे तर भविष्यात यावर लक्ष द्यावे लागेल.कारण नेपाळसारखा एखादा छोटा देश यास एकट्याने निपटारा करु शकणार नाही.

मनीषा कोईराला हीने सद्गुरुंना केला प्रश्न –

सद्गुरु यांच्या सोबत व्यासपीठावर बसलेली अभिनेत्री मनीषा कोइराला हीने त्यांना विचारले की एवढ्या मोठ्या हानीतून काय शिकू शकतो. त्यावर उत्तर देताना त्यांनी केवळ नुकत्याच झालेल्या अपघाताचा उल्लेख केला नाही तर हे देखील सांगितले की माणासांचे जीवन किती नाजूक आहे.

संकटे येण्याची वाट पाहू नये – सद्गुरु

सद्गुरु म्हणाले की, मानव म्हणून आपण संकटे येण्याची वाट पाहू नये. माणूस म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आपण प्रत्येक क्षणी नश्वर आहोत हे समजून घेणे. जर आपण याबद्दल सतत जागरूक राहिलो, तर आपण आपल्या जीवनाचे नियोजन करून ते अत्यंत समंजसपणे जगू शकू. त्यांनी लोकांना संकटांना “दैवी कारणे” किंवा “गूढ शक्यता” न मानण्याचे आवाहनही केले. ते म्हणाले की, अशा दृष्टिकोनांमुळे मानवी दुःखाचे वास्तव कमी लेखले जाऊ शकते. त्यांनी जीवनातील आध्यात्मिक पैलू आणि नैसर्गिक घटनांवर नियंत्रण ठेवणारे भौतिक नियम यांमधील फरक समजून घेण्याच्या गरजेवर भर दिला.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! अण्णा हजारे यांची प्रकृती बिघडली, बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल
  • ‘दायरा’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी करीना कपूर भडकली, सँडल दाखवत म्हणाली की…
  • Explainer : आता नेपाळचं व्हायरल घर, तेव्हा केदारनाथचं मंदीर, महाप्रलयात दोघेही शाबूत कसे? वाचा A टू Z
  • पैशासाठी अशा ठिकाणी जाऊ नका.. अर्चना पूरन सिंह यांना ‘लेटेंट’मध्ये पाहून भडकला प्रसिद्ध कॉमेडिअन
  • या वनस्पतीची पानं म्हणजे सापांवर जालीम उपाय; पुडी बांधून फक्त एकदा घरात ठेवा, पुन्हा कधीच साप येणार नाही

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in