• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ॲप्पलचे स्टीव्ह जॉब्स यांचे गुरू नीम करोली बाबाचं नाव काय? कुठंय कुटुंब? मुलं करतात काय?

September 9, 2026 by admin Leave a Comment


ॲप्पलचे स्टीव्ह जॉब्स असोत की फेसबुक प्रमुख मार्क झुकरबर्ग, लोकप्रिय हॉलिवूड अभिनेत्री ज्युलिया रॉबर्टस हे जगातील बडे दिग्गज कैंची धाम येथे डोकं टेकवतात. उत्तराखंडमधील या आश्रमाकडे अनेकांचा ओढा आहे. नीम करोली बाबा यांच्या जीवनावर आधारीत हनुमान अंश चित्रपट गेल्या 27 दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर गाजत आहे. हा चित्रपट पाहायला प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली आहे. लोक चित्रपट गृहात पायातील जोडे, चप्पल काढून हा सिनेमा पाहत आहेत. बाबा यांचं कुटुंब सध्या कुठं आहे? त्यांची मुलं काय करत आहेत, हे तुम्हाला माहिती आहे का?

काय होते मूळ नाव?

नीम करोली बाबांचं मूळ नाव लक्ष्मी नारायण शर्मा असे होते. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यामधील अकबरपूर या गावात झाला. ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला. लहान असतानाच त्यांचे लग्न झाले. पण पुढे त्यांनी गृहस्थाश्रम जीवनाचा त्याग करून साधुत्व पत्करले. ते संन्यासी झाले. असे असले तरी ते कुटुंबाला भेटायला नेहमी येत. गावात रमत.

नीम करोली बाबाचं कुटुंब कुठे आहे?

नीम करोली बाबा यांची पुढची पिढी ही उत्तर प्रदेशातील आग्रा (रामबाग परिसर) आणि भोपाळ या शहरात अत्यंत साधेपणाने राहते. कोट्यवधि भक्तांचे दैवत असलेल्या बाबांचे कुटुंब अगदी साधेपणाने त्यांचे आयुष्य जगत आहे. त्यांनी कधीही बाबांच्या प्रसिद्धीचा गैरफायदा घेतला नाही. कुटुंबातील सदस्य केवळ गरज पडली तेव्हा बाबांच्या ट्रस्ट आणि आश्रमाच्या कार्यात मदत करतात.

मुलं सरकारी उच्च पदावरून सेवानिवृत्त

नीम करोली बाबा यांना दोन मुलं आणि एक मुलगी होती. बाबांची मुलं ही उच्च शिक्षित होती. त्यांनी सरकारी परीक्षा दिली आणि नोकरी मिळवली. मोठा मुलगा सनातन शर्मा हे उत्तर प्रदेश पोलिसांमध्ये डीएसपी(DSP) या उच्च पदावर कार्यरत होते. पुढे ते सेवानिवृत्त झाले. दुसरा मुलगा धर्म नारायण शर्मा हे सरकारी जलसंपदा विभागात उच्च पदावर होते. ते सुद्धा सेवानिवृत्त झाले.

कुटुंबियांना हवे घर ताब्यात

नीम करोली बाबा यांचे अकबरपूर गावात घर आहे. हे घर श्री ठाकुर हनुमान जी ट्रस्टचे व्यवस्थापनाकडे आहे. नीम करोली बाबा यांच्या 6 नातींनी काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे हे घर ताब्यात देण्याची मागणी केली आहे. याविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी तीन सदस्यांची एक समिती गठीत केली आहे. घर ताब्यात न मिळाल्यास कुटुंबियांनी कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ…
  • Chanakya Niti : अशा लोकांकडे गुणवत्ता असूनही लोक करतात दुर्लक्ष, चाणक्य यांनी सांगितली लक्षणं
  • अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
  • IPL 2027: महेंद्रसिंह धोनीबाबत मोठा खुलासा! चेन्नई सुपर किंग्सच्या खेळाडूने सांगितली आतली गोष्ट, नेमकं काय घडतंय?
  • पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक प्रकार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in