• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ही वनस्पती घराजवळ लावूच नका, पावसाळ्यात असतं सापांचं सर्वात आवडतं ठिकाण, परिसरात कायम सापं दिसणार

May 31, 2026 by admin Leave a Comment


उन्हाळा आता संपत आला आहे. अवघ्या काही दिवसांमध्ये देशासह राज्यात आता मान्सूनचं आगमन होणार आहे. पावसाळा हा तसा अल्हादायक ऋतु असतो. या काळात सर्वत्र हिरवळ असते. निसर्ग हिरव्या रंगानं न्हाऊन निघतो. याच काळात अनेक जण ट्रेकला जाण्याचे किंवा बाहेर कुठेतरी फिरायला जाण्याचे, पावसात मनसोक्त भिजण्याचे प्लॅन बनवतात. तसेच मान्सूनच्या आगमनाबरोबरच खरीप हंगामाला सुरुवात झाल्यामुळे शेतकरी वर्ग देखील आपल्या कामात व्यस्त होतो. त्यामुळे आता सर्वांचं लक्ष सध्या मान्सूच्या आगमनाकडे लागलं आहे. मात्र या काळात आणखी एक गोष्ट घडते ती म्हणजे पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. वेळेत उपचार न मिळाल्यानं अशा घटनांमध्ये काही जणांचा मृत्यू देखील होतो. पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ का होते? तर त्याचं मुख्य कारण म्हणजे पावसाळ्यात सापांच्या बिळात पाणी जातं, सांपाच्या बिळात पाणी गेल्यानंतर ते बिळातून बाहेर पडतात. अनेकदा असं देखील होतं की जर जोरदार पाऊस झाला तर सापांची बिळं मातीमुळे बुजली जातात. त्यामुळे देखील साप रस्त्यावर फिरतात आणि सर्पदंशाचा धोका वाढतो.

पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होण्याची दोन मुख्य कारणं आहेत, ती म्हणजे पावसाळ्यात पाऊस पडल्यामुळे शेतात गार्डन आणि इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात गवत वाढते. शेतातील पीक देखील वाढलेली असतात. अनेकदा अशा ठिकाणी साप लपून बसतात. वाढलेल्या गवतामुळे आपल्याला सापांचा अंदाज येत नाही आणि त्यांच्यावर पाय पडला किंवा त्यांना धोका जणावला की ते तुम्हाला दंश करतात. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे पावसाळ्यात सापांच्या बिळात पाणी घुसतं, अशावेळी साप बिळातून बाहेर पडतात, ते आश्रयासाठी सुरक्षित अंधाऱ्या पंरतु कोरड्या जागेचा शोध घेतात. त्यांना जर अशी जागा तुमच्या घरात सापडली तर ते तुमच्या घरात प्रवेश करतात. अशा स्थितीमध्ये तुमचं थोडं जरी दुर्लक्ष झालं तरी तुम्हाला सर्पदंश होऊ शकतो. या ठिकाणी नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवावी, जर तुम्हाला कुठे साप दिसलाच तर त्याला पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न करू नका, तर त्याची माहिती सर्पमित्रांना द्या. ते सापांना रेस्क्यू करतील.

आता आपण अशा एका झाडाची माहिती जाणून घेणार आहोत, ज्याच्या विशिष्ट गुणांमुळे साप या झाडाकडे आकर्षित होतात. हे झाड आहे, खाण्याच्या पानाचं ज्याला आपण नागिणीच्या पानाचा वेल असं देखील म्हणतो. हा वेल मोठ्या प्रमाणात वाढतो. सर्व जमिनतीवर किंवा घरावर पसरतो. या ठिकाणी अडचण निर्माण होते, त्यामुळे या वेलीखाली लपण्यासाठी सापांना सुरक्षित जागा सापडते. तसेच या वेलीच्या पानाचा आकार हा मोठा असल्यामुळे पानाखालची जमीन देखील भिजत नाही, त्यामुळे साप या झाडाला पावसाळ्यात आपलं घर बनवतात. अनेकदा अशा झाडांखाली साप आढळून येतात. त्यामुळे पावसाळ्यात हे झाडं कधीही घरात शेजारी लावू नये, असं मानलं जातं.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • देवस्थान इनाम जमीन कायदा लवकरच येणार, पहिल्या बैठकीत रुपरेषा ठरली
  • आयुष्यातील सर्वांत वाईट सकाळ..; मराठी अभिनेत्याच्या जवळच्या व्यक्तीचं निधन, हृदय पिळवटून टाकणारी पोस्ट
  • विद्यार्थ्याने अंडरगारमेंटमध्ये लपवलेले सिम कार्ड अन् मागच्या वर्षीचा पेपर…Neet पुर्नपरीक्षेदरम्यान धक्कादायक प्रकार
  • Vastu Shastra: रविवारच्या दिवशी करा हे सोपे उपाय; आयुष्यच बदलून जाईल, सर्व आर्थिक संकटं होतील दूर
  • सोनाक्षी ग्लॅमरस लूकमध्ये पाहताच चाहत्यांचा चुकला काळजाचा ठोका, फोटो पाहून म्हणाल…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in