• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

हम ‘आप’ के ‘सात’ नही, राघव चढ्ढा यांच्यासोबत केजरीवालांना धक्का देणारे सात खासदार कोण? नावं आली समोर; एका क्रिकेटपटूचाही समावेश

April 24, 2026 by admin Leave a Comment


आम आदमी पार्टीसमोर (AAP) एक मोठे राजकीय संकट उभे राहिले आहे. पक्षाचे दिग्गज नेते आणि राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी ‘आप’ सोडण्याची घोषणा केली आहे. चड्ढा यांच्यासोबतच संदीप पाठक आणि अशोक मित्तल हे दोन अन्य खासदारही भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश करणार आहेत. या तिघांनीही एकत्रित पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. चड्ढा यांनी थेट आपल्या जुन्या पक्षावर निशाणा साधत म्हटले की, आम आदमी पार्टी आता आपल्या मूळ सिद्धांतांपासून पूर्णपणे भरकटली आहे. राघव चड्ढा यांनी असा दावा केला आहे की, हरभजन सिंग, स्वाती मालीवाल, विक्रमजीत सहानी, राजेंद्र गुप्ता यांनीही त्यांच्यासोबत आम आदमी पार्टी सोडली आहे.

शुक्रवारी (२४ एप्रिल) आम आदमी पार्टीला मोठा धक्का देत राघव चड्ढा यांनी ही घोषणा केली. चड्ढा यांच्यासोबत स्वाती मालीवाल, अशोक मित्तल, संदीप पाठक, विक्रम साहनी, राजिंदर गुप्ता आणि हरभजन सिंग भाजपमध्ये सामील होणार आहेत. हे सर्वजण राज्यसभेत ‘आप’चे खासदार आहेत. राज्यसभेत ‘आप’चे एकूण १० खासदार आहेत. याचा अर्थ आता ‘आप’चे दोन-तृतीयांश राज्यसभा खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

अँटी डिफेक्शन लॉ (पक्षांतर बंदी कायदा) काय सांगतो?

भारताच्या पक्षांतर बंदी कायद्यानुसार (संविधानातील दहावी अनुसूची), जर एखाद्या पक्षात पडलेल्या फुटीला मान्यता हवी असेल आणि अपात्रता टाळायची असेल, तर राज्यसभेतील पक्षाच्या किमान दोन-तृतीयांश (२/३) सदस्यांनी एकत्र असणे आवश्यक आहे.

‘आप’चे राज्यसभेतील एकूण सदस्य = १०

पक्षदोष कायद्यांतर्गत फूट वैध मानली जाण्यासाठी किमान ७ खासदार एकत्र येणे आवश्यक आहे. राघव चड्ढा यांच्यासाठी ७/१० खासदारांचा पाठिंबा असणे गरजेचे आहे, तरच पक्षांतर बंदी कायद्यातून वाचत भाजपमध्ये जाणे शक्य होईल. म्हणजेच, ‘आप’च्या राज्यसभा गटातील ७०% सदस्यांना एकत्र आणावे लागेल.

भाजपप्रती आपला विश्वास व्यक्त करताना राघव चड्ढा म्हणाले, “मी एक योग्य माणूस होतो जो चुकीच्या पक्षात अडकला होता. गेल्या १२ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने असे धाडसी निर्णय घेतले आहेत, जे घेण्यास इतर पक्ष घाबरत होते. या नेतृत्वावर देशातील जनतेने एकदा नाही, तर तीनदा आपला अढळ विश्वास व्यक्त केला आहे.”



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा AAPला रामराम
  • Jio, Airtel की Vi कोणाचं इंटरनेट सुपरफास्ट? उत्तर वाचून चकित व्हाल
  • सचिनने लावला होता डाव, आता त्या कंपनीचा शेअर गगनाला भिडला, एकाच महिन्यात 53 टक्के तेजी
  • AAP | दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला; केजरीवाल यांना सर्वात मोठा धक्का
  • KKR IPL Playoff: सात पैकी एक सामना जिंकलेल्या केकेआरला प्लेऑफची संधी, कसं काय ते समजून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in