
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना राज्यातील राजकीय घडामोडी, एमपीएससी पेपरफुटी प्रकरण आणि राष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रमांचे गुजरातला होणारे स्थलांतर यांवरून भाजपप्रणित महायुतीवर सरकारवर घणाघाती टीका केली. अजित पवार गटाच्या महायुतीतील भविष्याबद्दल आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर रोहित पवारांनी मोठे वक्तव्य केले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का? या प्रश्नावर रोहित पवार यांनी आपलं स्पष्ट म्हणणं मांडलं आहे. रोहित पवार म्हणाले की, ‘मी पुरावे दिले होते. कुठेतरी एक प्रयत्न प्रफुलची पटेल यांनी केला होता. सुनील तटकरे आणि त्यांचा पक्षावर ताबा आणण्याचा प्रयत्न होता. हे पुरावे मी पूर्वी दिले होते. तो विषय पुन्हा एकदा चर्चेत आणून काय फायदा होईल असं वाटत नाही. मुद्दा इतकाच आहे की त्यांचा पक्ष आणि आमचा पक्ष कधीच एकत्र येणार नाही. जिथपर्यं ते भाजपाची साथ सोडत नाहीत. ‘
Leave a Reply