• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

विठाबाईंच्या बायोपिकच्या नावावरून वाद; राष्ट्रवादी चित्रपट विभागाच्या मागणीला कुटुंबीयांचा जाहीर पाठिंबा

June 26, 2026 by admin Leave a Comment


महाराष्ट्राच्या लोककलेचा अभिमान असलेल्या विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या नावावरून नवा वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटाला ‘ईठा’ हे नाव देण्यात आले असून, या नावाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाने आक्षेप घेतला आहे. लोककलेचा आणि विठाबाई यांच्या कार्याचा योग्य सन्मान राखण्यासाठी चित्रपटाचे नाव “विठाबाई” किंवा “विठा” असे ठेवावे, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या मागणीला विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांनीही जाहीर पाठिंबा दिला आहे.

राष्ट्रवादीच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाच्या मते, विठाबाई नारायणगावकर हे नाव केवळ एका व्यक्तीचे नसून महाराष्ट्राच्या लोककला परंपरेचे प्रतीक आहे. त्यांनी आयुष्यभर तमाशा आणि लावणी या लोककलांच्या जतनासाठी आणि संवर्धनासाठी मोठे योगदान दिले. त्यामुळे त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाला असे नाव असावे, जे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि वारशाचा सन्मान करणारे ठरेल.

कुटुंबीयांचाही राष्ट्रवादीच्या मागणीला पाठिंबा

महाराष्ट्राच्या लोककलेचा अभिमान असलेल्या स्वर्गीय विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या नावाबाबत राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाने घेतलेल्या भूमिकेला विठाबाईंचे सुपुत्र कैलास नारायणगावकर, राजेश नारायणगावकर तसेच त्यांचे सख्खे नातू मोहित नारायणगावकर यांनी जाहीर समर्थन दिले आहे.

लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘ईठा’ या चित्रपटाच्या नावाबाबत राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी केलेली मागणी योग्य व रास्त असल्याचे मत विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केले असून, या मागणीच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. विठाबाई नारायणगावकर यांच्या कार्याचा आणि योगदानाचा योग्य सन्मान व्हावा, हीच आमची भूमिका असल्याचे राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाने सांगितले आहे.

निर्मात्यांची भूमिका अद्याप स्पष्ट नाही

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाने नाव बदलण्याची मागणी केली असली, तसेच कुटुंबीयांनीही त्याला पाठिंबा दिला असला, तरी चित्रपटाच्या निर्माते किंवा दिग्दर्शकांकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे निर्माते ही मागणी मान्य करून चित्रपटाचे नाव बदलतात की मूळ शीर्षक कायम ठेवतात, याकडे आता चित्रपटसृष्टीसह लोककला रसिकांचे लक्ष लागले आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : घरात नवीन तुळशीचं रोप कधी लावावं? काय आहेत नियम?
  • विलास घुले हत्या प्रकरण तापणार, धनंजय मुंडे यांचा थेट रस्त्यावर उतरण्याचा इशारा, पोलिसांवरही संतापले
  • उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आला समोर
  • 100 कोटींच्या उंबरठ्यावर ‘देऊळ बंद 2’; किरण गायकवाडची प्रवीण तरडेंसाठी भावूक पोस्ट
  • विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? ‘पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला… बड्या नेत्याच्या दाव्याने राजकारणात खळबळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in