
नाशिकच्या लासलगावहून दिल्लीला रवाना होणाऱ्या कांदा एक्स्प्रेसबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आज दुपारी दोन वाजता ही एक्स्प्रेस दिल्लीच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. मात्र, ही रेल्वे तब्बल अठ्ठावीस तासांच्या विलंबाने सुटत आहे. या मालगाडीमध्ये कांदा लोडिंगला उशीर झाल्यामुळे हा विलंब झाल्याचे सांगण्यात येत आहे. सुरुवातीला ८४० टन कांदा दिल्लीला पाठवण्याचे नियोजन होते, परंतु आता प्रत्यक्षात ५०० टन कांदाच दिल्लीला पाठवण्यात येणार आहे.
कांद्याच्या पॅकिंगमध्ये झालेल्या अडचणींमुळे लोडिंग प्रक्रियेला विलंब झाला, अशी माहिती उपलब्ध आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही एक्स्प्रेस महत्त्वाची मानली जाते, त्यामुळे विलंब आणि घटलेल्या लोडिंग क्षमतेमुळे काही प्रमाणात चिंता व्यक्त केली जात आहे.
Leave a Reply