
‘बिग बॉस 19’चा विजेता आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेता गौरव खन्नावर सध्या नेटकरी प्रचंड संतापले आहेत. गौरव आणि त्याची पत्नी आकांक्षा चमोला यांच्यावर चाहते जोरदार टीका करत आहेत. यामागचं कारण म्हणजे ‘लॉक अप सिझन 2’मध्ये आकांक्षाने केलेल्या त्यांच्या घटस्फोटाचा खुलासा. गेल्या वर्षभरापासून आम्ही वेगळे राहत असून लवकरच घटस्फोट घेणार आहोत, असं तिने या शोमध्ये सांगितलं. इतकंच नव्हे तर, आमच्यात विवाहित जोडप्यांसारखी भावनाच राहिली नाही, असंही तिने म्हटलंय. हे ऐकून नेटकरी चांगलेच संतापले आहेत. जर गेल्या वर्षभरापासून हे दोघं वेगळे राहत आहेत, तर मग ‘बिग बॉस 19’च्या फॅमिली वीकदरम्यान दाखवलेलं प्रेम आणि त्यांचा रोमान्स खोटा होता का, असा सवाल नेटकरी करत आहेत.
सोशल मीडियावर नेटकरी गेल्या वर्षभरातील आकांक्षा आणि गौरवचे व्हिडीओ शेअर करत आहेत. या सर्व व्हिडीओंमध्ये दोघं एकत्र आणि एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. बिग बॉसच्या घरातही गौरव आणि आकांक्षा यांच्यातील रोमँटिक अंदाज पहायला मिळाला होता. या सर्व दिखाव्यामुळे नेटकरी संतप्त झाले असून त्यांनी या दोघांना ‘ड्रामेबाज’ असं म्हटलंय.
नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
Gk ne sach me acting ki
1 saal se alag hai to bb me kya drama tha bhai
Ab to proof ho gya show scripted tha gk ki bv ko itni acting krni padi pehle se sb set tha khaer gk to mind blowing actor hai ye to maan gyi mai
Gk ki wife bhi sauteli nikli#FarrhanaBhatt #Gauravkhanna https://t.co/6P4ZXdfVhW pic.twitter.com/xnT0Nin1un
— Ruby khan (@KhanRuby91013) June 27, 2026
Hana was so right he was acting it out all the time. #LockUpp2 #FarrhanaBhattpic.twitter.com/utNDgz8uqz
— ♡ (@cinephile__1) June 27, 2026
‘बिग बॉस 19’च्या फॅमिली वीकदरम्यान गौरव खन्नाला पाठिंबा देण्यासाठी आकांक्षा शोमध्ये पोहोचली होती. त्यावेळी दोघं एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले दिसले. त्यांचं नातं आधीच संपलंय हे माहीत असूनही सुखी विवाहित जोडप्याचं नाटक कसं करू शकतात, असा प्रश्न विचारत नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत. मग हे सर्व फक्त रिअॅलिटी शोजसाठी होतं का, गौरव शोमध्ये चांगला नवरा दिसावा म्हणून हे सगळं केलं का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Ye to @Rj_pranit ne 4 mahine pehle hi predict kiya tha
#PranitMore #GauravKhanna pic.twitter.com/dokoRrAUfk
— Supreme (@DarshanShi67146) June 28, 2026
‘लॉक अप सिझन 2’च्या प्रोमोवर नेटकरी संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. ‘तुम्हा दोघांनाही लाज वाटायला पाहिजे’, असं एकाने लिहिलं. तर ‘आकांक्षा, तू खरंच खूप निर्लज्ज आहेस, तू गौरवच्या लायकीचीही नाहीस’, अशा शब्दांत दुसऱ्याने राग व्यक्त केला आहे. ‘गौरव खन्ना.. तू आणि तुझी पत्नी नेहमीच खोटे वागला आहात. बिग बॉसमध्ये जे दाखवलं, ते सर्व फक्त नाटक होतं’, असं आणखी एका युजरने म्हटलं आहे. काहींनी आकांक्षाने हे सर्व फक्त पब्लिसिटी स्टंटसाठी केला असल्याचाही दावा काही युजर्स करत आहेत. ‘लॉक अप 2’मध्ये टिकून राहण्यासाठी तिला एक गुपित उघड करायचं होतं, त्यामुळे लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी तिने असं सगळं सांगितलं, असा दावा नेटकऱ्यांनी केला आहे. यावेळी काहींनी अभिनेत्री रुबिना दिलैकचंही उदाहरण दिलं. बिग बॉसच्या घरात रुबिनानेही असाच खुलासा केला होता आणि नंतर ती शो जिंकली होती.



Leave a Reply