• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

रोहित शर्माच्या निवृत्तीच्या चर्चांनंतर आर अश्विनने टीम इंडियाबाबत उपस्थित केले प्रश्न, बीसीसीआयला सुनावलं

July 17, 2026 by admin Leave a Comment

इंग्लंडविरुद्ध वनडे मालिका सुरू असताना रोहित शर्माच्या निवृत्तीच्या चर्चांचा धुराळा उडाला आहे. खरंच निवृत्ती घेणार का? तसेच त्याच्या क्रिकेट कारकि‍र्दीचा शेवटचा सामना असणार का? या प्रश्नांचा क्रीडाप्रेमींनी भडिमार केला आहे. असं असताना टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आर अश्विन यानेही टीम इंडिया आणि बीसीसीआयच्या विचार आणि परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. आर अश्विनच्या मते, खेळाडूंसोबत चर्चा करून त्याने बाहेर काढलं पाहीजे. अश्विनच्या या प्रश्नामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. खेळाडूंसोबत थेट बोललं जात नाही, असा अर्थ यातून निघतो. अश्विनने बीसीसीआय आणि टीम इंडियावर टीका करत सांगितलं की, खेळाडूंच्या कारकि‍र्दीचा शेवट अजून चांगल्या प्रकारे होऊ शकतो.

आर अश्विन काय म्हणाला?

रोहित शर्माच्या निवृत्तीच्या वावड्या उठल्या असताना आर अश्विनने याबाबत आपलं म्हणणं मांडलं आहे. आर अश्विन म्हणाला की, ‘बघा, संघातून कोणीही ड्रॉप होऊ शकतं. ते निवडकर्ते, कर्णधार आणि प्रशिक्षकाचं काम आहे. संघातून वगळल्यानंतर खेळाडू विचारू शकतो की, मी काय केलं तर संघात माझी पुन्हा एन्ट्री होईल. जर काहीच काम नसेल तर सोडायला हवं, वय झालं असेल तर सोडावं लागेल.’

YOUR THOUGHTS ???

Ravichandran Ashwin gives a great example of communication when it comes to remove a top guy like Rohit Sharma. 🔥

And I think he is absolutely right about it. Rohit Sharma deserved better treatment from the selectors.

(Ash ki Baat w/Vimal Kumar) https://t.co/hpe7gXqmpG pic.twitter.com/6Bgba2yL1l

— TheFakeFakeer (@TheFakeFakeer) July 17, 2026

आर अश्विन पुढे म्हणाला की, ‘माझा मुद्दा हा आहे की खेळाडूशी थेट संवाद व्हायला हवा. हे चांगल्या प्रकारे केले जाऊ शकते. तुम्ही मोठ्या कंपन्यांकडे पाहिल्यास, त्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकतात. पण जर वरिष्ठ स्तरावर कोणी असेल ज्याने कंपनीसाठी खूप योगदान दिले आहे, तर त्यांच्याशी चांगल्या प्रकारे बोलले पाहिजे.”

आर अश्विन पुढे सांगितलं की, “जर कोणी तुमच्यासाठी दोन दशके चांगली कामगिरी केली असेल, इतके सामने जिंकले असतील, तर त्यांच्याशी चांगल्या प्रकारे बोलले पाहिजे. त्यांना चांगल्या प्रकारे मार्ग दाखवला पाहिजे. अगदी त्यांना संघातून वगळण्याचा निर्णयसुद्धा अधिक चांगल्या प्रकारे घेतला जाऊ शकतो.’

आर अश्विनने त्याच्या युट्यूब चॅनेलवर मत मांडताना सांगितलं की, जर रोहित शर्माला काढायचं होतं तर चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर लगेच निर्णय घ्यायला हवा होता. दक्षिण अफ्रिकेत रोहित शर्माच्या अनुभवाची गरज भासेल. जयस्वालची कामगिरी चांगली आहे. पण रोहित अनुभव कामी येईल.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in