• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! भारत बांगलादेश बॉर्डरवर तणाव, रातोरात 40 जण बेपत्ता, थेट बीएसएफने..

June 7, 2026 by admin Leave a Comment


भारत आणि बांगलादेश यांच्यात गेल्या काही दिवसांपासून तणाव बघायला मिळत आहे. बांगलादेश गंगा नदीचा करार पूर्ण होण्यापूर्वीच पाकिस्तान आणि चीनचा हात पकडताना दिसत आहे. त्यामध्येच पुन्हा एकदा भारत आणि बांगलादेश यांच्यातील अवैध स्थलांतरितांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पश्चिम बंगालमधील भारत आणि बांगलादेश सीमेवर सीमा सुरक्षा दल आणि बॉर्डर गार्ड बांगलादेश यांच्यात अनेक ठिकाणी तणाव दिसत आहे. भारताने बांगलादेश बॉर्डरवर सुरक्षा अधिक मजबूत केली. त्यामध्येच हा तणाव बॉर्डरवर असताना आता अजून एक धक्कादायक बातमी पुढे येत आहे. ज्याने भारतात मोठी खळबळ उडाली. सीमेवर रात्री झिरो पॉईंट येथे अडकलेले तब्बल 40 बांगलादेशी नागरिक अचानक बेपत्ता झाले. हे लोक अचानक बेपत्ता झाल्याने तणाव अधिकच वाढला.

कूचबिहार जिल्ह्यातील मेखलीगंज भागातील पानिशाला परिसरात पिलर क्रमांक 134 जवळ सर्वाधिक तणाव दिसून आला. सीमेवरील झिरो पॉईंटवर दहा जण अडकले होते. भारताने त्यांना बेकायदेशीरपणे परत पाठवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा बांगलादेशने केला. बीजीबीने त्यांना स्वीकारण्यास नकार दिला. भारतानेही त्यांना परत पाठवले.

बीएसएफने हा प्रश्न सोडवण्यासाठी ध्वज बैठकीचा प्रस्ताव दिला, पण त्यालाही बांगलादेशने नकार दिला. शनिवारी पहाटे तणावानंतर जोरदार शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर जवान बांगलादेशी हद्दीत परतले. कूचबिहारमधील, शितलकुची, जलपाईगुडी आणि दिनहाटा येथे तणाव बघायला मिळाला. या भागात महिला आणि मुलांसह 30 बांगलादेशी सीमेवर अडकले होते.

शुक्रवारी रात्रीपर्यंत हे लोक सीमेवरच अडकून पडली होती. मात्र, शनिवारी सकाळी हे सर्वजण अचानक बेपत्ता झाले. एकून 40 जण अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली. अखेर हे 40 जण बांगलादेशात गेले की, परत भारतात आले, याबाबत चर्चा सुरू आहे. बांगलादेश त्यांना घेण्यास नकार देत होता. ज्यामुळे आता सीमेवर पुन्हा एकदा तणाव बघायला मिळत आहे. आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये अवैध बांगलादेशी नागरिकांविरोधात जोरदार कारवाई सुरू आहे. बांगलादेशी नाहरिकांना त्यांच्या देशात पाठवले जात आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Onion Crisis : पुन्हा हिमालयासाठी सह्याद्री धावला… महाराष्ट्र देणार दिल्लीला 840 टन कांदा; थेट कांदा एक्सप्रेस…
  • Gen Z विद्यार्थ्यांनंतर आता Gen Z क्रिकेटरचंही आंदोलन, 250 हून अधिक तरुण रस्त्यावर उतरले, कारण काय?
  • केंद्र सरकारचा अत्यंत मोठा निर्णय, साखरेच्या आयातीच्या नियमात थेट बदल..
  • WhatsApp हॅकिंगचा धक्कादायक प्रकार, कुरिअरच्या कॉलपासून खेळ सुरू; सुप्रिया सुळे, वनिता खरात यांच्या प्रकरणांनी वाढवली चिंता
  • Shugar Rate : साखरेच्या वाढत्या किंमती रोखण्यासाठी सरकारने अचानक बदलला हा नियम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in