
राजकीय नेते अतुल भातखळकर यांनी दिशा सालियन प्रकरणाच्या चौकशीबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवली असून, सीबीआय या प्रकरणी पूर्ण आणि सखोल तपास करेल, असा विश्वास भातखळकर यांनी व्यक्त केला. त्यांच्या मते, सीबीआय कायद्याच्या आधारावर निपक्षपणे आणि न्यायपूर्ण तपास करेल, ज्यामुळे सत्य समोर येईल. यावेळी अतुल भातखळकर यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या भूमिकेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले की, “माझा प्रश्न एवढाच आहे की आदित्य ठाकरेंनी या प्रकरणामध्ये हस्तक्षेप कशाला केला? त्याचा खुलासा त्यांनी करावा.
” भातखळकर यांच्या या मागणीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सीबीआय तपास सुरू करत असताना, आदित्य ठाकरे यांच्या कथित हस्तक्षेपावर भातखळकरांनी लक्ष वेधले आहे. या प्रकरणातील पुढील घडामोडींवर आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply