• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! एक मोठी चूक झालीच, 6 बडंखोर खासदार होणार अपात्र? ठाकरेंनी फिरवला गेम, आता थेट…

June 24, 2026 by admin Leave a Comment


शिवसेना ठाकरे गटात काही दिवसांपूर्वीच मोठी फूट पडल्याचं पहायला मिळालं, शिवसेना ठाकरे गटाच्या 9 पैकी 6 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. जेव्हा एखाद्या पक्षातून दोन तृतियांश खासदार एकाचवेळी बाहेर पडतात, तेव्हा अशा खासदारांचा दुसऱ्या पक्षातील प्रवेश ग्राह्य धरला जातो, त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होत नाही,  तसेच त्यांना लोकसभा अध्यक्षांकडून स्वतंत्र गटाची देखील मान्यता मिळते. शिवसेना ठाकरे गटातून दोन तृतियांश खासदार एकाचवेळी बाहेर पडले, तसेच आम्ही सर्व संविधानातील तरतुदीचे पालन करून आणि कायद्याच्या चौकटीत राहूनच हा पक्षप्रवेश घडवून आणला आहे, ऑपरेशन टायगर सक्सेसफूल झालं आहे, असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता.

मात्र आता शिवसेना ठाकरे गटाचे मुख्य प्रतोद अनिल देसाई यांनी केलेल्या दाव्यामुळे प्रकरणात मोठं ट्विस्ट आलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज लोकसभेचे शिवसेना ठाकरे गटाचे गटनेते अरविंद सावंत आणि प्रतोत अनिल देसाई यांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली. यावेळी त्यांनी लोकसभा अध्यक्षांसोबत जवळपास 35 मिनिटं चर्चा केली. या चर्चेनंतर अनिल देसाई यांच्याकडून मोठा दावा करण्यात आला आहे.

नेमकं काय म्हणाले अनिल देसाई? 

शिवसेना ठाकरे गट हा मुळ पक्ष आहे. दोन तृतियांश जरी त्यांचा आकडा असला त्यावरून जरी त्यांनी वेगळ्या गटाचा दावा केला असला तरी संविधानातील शेड्यूल 10 मध्ये जे प्रोव्हिजन आहे, त्यामध्ये जी मुळ ओरिजनल पार्टी आहे, ती जर एखाद्या पक्षात विलीन होत असेल तर त्या विलिनीकरणाला एकूण खासदारांपैकी दोन तृतियांश खासदारांचा पाठिंबा असला पाहिजे. मात्र इथे मुळ पक्ष म्हणजे शिवसेना ठाकरे गट हा कोणत्याही पक्षात विलीन झाला नाही, आमचा स्वतंत्र पक्ष आहे. त्यामुळे अशा पद्धतीने या खासदारांना पक्षातून बाहेर पडता येत नाही. या खासदारांनी संविधानातील तरतुंदीचं उल्लंघन केलं आहे, त्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी आता न्यायिक भूमिका घ्यावी अशी विनंती त्यांना यावेळी आम्ही केल्याची माहिती देसाई दिली आहे.

दरम्यान लोकसभा अध्यक्षांनी देखील  संविधानातील शेड्यूल 10 मध्ये जी प्रोव्हिजन आहे, तिची नोंद घेतली आहे, असा दावा देखील देसाई यांनी केला आहे. जे बंडखोर खासदार आहेत, त्यांनी  शिवसेना ठाकरे गटाचं जे अधिकृत चिन्ह आहे, जे निवडणूक आयोगाने दिलं आहे, मशाल या चिन्हावर ते निवडणून आले होते, आणि ते निवडून आल्यानंतर एक प्रक्रिया असते, ज्याची लोकसभेच्या सभागृहात नोंद होते. तेव्हा ती पार्लमेंटरी पार्टी म्हणून ओळखली जाते. तिच्या नोंदीमध्ये हे सर्व सभासद आहेत. त्यामुळे यांना घटनेचे संविधानाचे सर्व नियम लागू आहेत, हे सर्व शिवसेना ठाकरे पक्षाचे सदस्य आहेत, आणि आमची पार्टी कोणत्याही पक्षात विलिन झालेली नाही, त्यामुळे हा नियम त्यांना लागू होत नाही, असा दावाही यावेळी देसाई यांनी केला आहे, त्यामुळे आता लोकसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • चेकबुक वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! जुने चेकबुक आता चालणार नाही? जाणून घ्या बँकेचे नवे नियम
  • IND vs SL: पाचव्या दिवशी टीम इंडियाचा विजयाचं स्वप्न भंगणार का? हातातला सामना ड्रॉ होण्याची भीती!
  • सोशल मीडियावर ‘झुठ की गुंज’ संकेतस्थळाची चर्चा, राहुल गांधींचे दावे चुकीचे दावा
  • Kriti Sanon : फिल्मी पडद्यावरच नाही, कमाईतही ‘हिट’; क्रिती सेननची कमाई नेमकी किती? संपत्तीचा आकडा थक्क करणारा
  • सून बायसेक्शुअल असल्याचं कळल्यावर गौरव खन्नाच्या आई-वडिलांनी काय केलं? आकांक्षा चमोला म्हणाली…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in