• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मूर्ख पाकिस्तानची पोलखोल, भारताने कितीही दान केलं तरी…माजी राजदूताने सगळं बाहेर काढलं!

August 2, 2026 by admin Leave a Comment


India Pakistan Relations : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध खूप अगोदरपासूनच बिघडलेले आहेत. या दोन्ही शेजारी राष्ट्रांमधील संबंध सुरळीत व्हावेत यासाठी अनेकदा प्रयत्न झाले. परंतु अद्याप यात यश आलेलं नाही. 2025 साली पहलगाम हल्ल्यानंतर तर भारताचे पाकिस्तानसोबतचे संबंध जास्तच बिघडले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात आता कोणताही व्यापार होत नाही. भारताने पाकिस्तानसोबत कोणताही व्यवहार करणार नसल्याचे जाहीर केलेले असले तरीही पाकिस्तान मात्र भारताविरोधात अजूनही कुरापती करत असतो. भारताने पाकिस्तानची वेगवेगळ्या मार्गांनी कोंडी केलेली आहे. सिंधू जलवाटप करार स्थगित करण्याचा निर्णयही याच रणनीतीचा भाग आहे. दरम्यान, याच सिंधू जलवाटप कराराबाबत पाकिस्तानचं दुखणं काय आहे? याची भारताचे माजी राजदूत विनय महोन क्वात्रा यांनी पोलखोल केली आहे.

पाकिस्तान अजूनही मागे का आहे?

अमेरिकेतील भारताचे राजदूत म्हणून काम केलेले विनय मोहन क्वात्रा यांनी सिंधू जलवाटप करारावर सविस्तर भाष्य केलंय. भारताने पाकिस्तानसोबत मैत्री आणि सद्भावनेच्या उद्देशाने हा करार केला होता. परंतु गेल्या कित्येक वर्षांपासून पाकिस्तानच्या आचरणात कोणताही बदल झालेला नाही, असं मत क्वात्रा यांनी व्यक्त केलंय. ‘न्यूजविक’मध्ये त्यांनी एक लेख लिहिला आहे. या लेखात त्यांनी पाकिस्तान कोणती चूक करतोय. पाकिस्तान अजूनही मागे का आहे? याची कारणं सांगितली आहेत. सिंधू जलवाटप करार स्थगित केल्याने अडचणीवाढणार नाहीत. उलट अगोदरपासूनच जे संबंध बिघडलेले आहेत, त्यांचा औपचारिक स्वीकार करणे होय, असं मत क्वात्रा यांनी व्यक्तं केलंय. भारताने 23 एप्रिल 2025 रोजी सिंध जलवाटप करार स्थगित केला होता. भारताच्या याच निर्णयाववर चर्चा करण्यासाठी पाकिस्तानात नुकतेच एक संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाची सगळीकडे चर्चा चालू असताना राजदूत विनय क्वात्रा यांनी लेख लिहून पाकिस्तानची पोलखोल केली आहे.

40 टक्के पाणी जातं वाया

सिंधू नदीचे साधारण 80 टक्के पाणी हे पाकिस्तानात जाते. परंतु यातील बरेच पाणी अजूनही वाया जाते. पाकिस्तानला मिळणाऱ्या एकूण पाण्यापैकी फक्त 40 टक्केच पाणी पाकिस्तानातील शेतापर्यंत पोहोचते, असं सांगत पाकिस्तानचे धोरण हे तकलादू आहे, असं क्वात्रा यांनी या लेखात सांगितलं आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sachin Ahir : ‘हिम्मत कशी होते? यापुढच्या काळात..’ माझगावमध्ये गणेश मिरवणुकीवर अंड फेकण्याच्या घटनेवर सचिन अहिर यांचं रोखठोक भाष्य
  • तीन दिवसानंतर काय होणार? नवं संकट डोक्यावर? हवामान खात्याचा अंदाज काय?
  • Manoj Jarange : तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
  • लाखो चाहत्यांची क्रश, हानिया आमिरच्या त्या व्हिडीओमुळे एकच खळबळ, चाहत्यांनी उपस्थित केले प्रश्न
  • Abhijit Dipke : अभिजीत दिपकेंचा आणखी एक मोठा विजय, अखेर सरकार झुकलं, घेतला तडकाफडकी सर्वात मोठा निर्णय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in