
झगमत्या विश्वातील अनेक अभिनेत्री आज बॉलिवूडपासून दूर आहेत. पण खासगी आयु्ष्यामुळे कामय चर्चेत असतात. सध्या ज्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री मुमताज आहेत. 1970 मध्ये मुमताज हिंदी सिनेविश्वाच्या सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. त्यांनी ‘दो रास्ते’, ‘बंधन’, ‘खिलौना’ यांसारख्या सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण त्याकाळात मुमताज फक्त त्यांच्या सिनेमांमुळेच नाही तर, त्यांच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत आलेल्या. कारण त्यांच्या नावाची चर्चा रंगलेली प्रसिद्ध दिग्दर्शक यश चोप्रा यांच्यासोबत.
रिपोर्टनुसार, यश चोप्रा यांनी अनेकदा मुमताज यांनी लग्नासाठी विचारलं. पण मुमताज यांनी कधीच यश चोप्रा यांच्या प्रेमाचा आणि भावनांचा स्वीकार केलं नाही. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की, यश यांचं माझ्यावर प्रेम आहे, पण माझं त्यांच्यावर कधीच प्रेम नव्हतं. एवढंच नाही तर, यश चोप्रा यांच्या निधनानंतर मुमताज यांनी यश चोप्रा यांच्याबद्दल मोठा खुलासा केलेला. एक मुलाखतीत मुमताज यांना विचारण्यात आलं की, ‘यश चोप्रा यांनी तुम्हाला प्रपोज केलं होतं?’
यावर मुमताज म्हणाल्या, ‘त्यांनी मला लग्नासाठी एकदा नाही तर 1000 वेळा विचारलं असेल. पण मी त्यांच्यावर कधी प्रेम केलंच नाही. प्रेम नसेल तर लग्न तरी कसं करणार. ते मला कायम म्हणायचे ‘ऐ मोटी आय लव्ह यू यार… मुझसे शादी कर ले…’ मी त्यांच्यावर प्रेम केलं पण फक्त दिग्दर्शक आणि निर्माते म्हणून. त्यापेक्षा जास्त काहीही नाही. मी लंडनमध्ये असताना कायम त्यांचा फोन यायचा ते म्हणायचे माझा नवीन सिनेमा प्रदर्शित झाला आहे नक्की बघ… ते कायम मला सिनेमा पाहायला सांगायचे… आता ते या जगात नाही याचं फार दुःख होत…’ असं देखील मुमताज मुलाखतीत म्हणाल्या होत्या.
मुमताज यांचं लग्न आणि मुलं
मुमताज यांनी इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं नाव मोठं केलं. पण इंडस्ट्रीतील पुरुषासोबत लग्न केलं नाही. मुमताज यांनी 1974 मध्ये मयूर माधवानी यांच्यासोबत लग्न केलं. मुमताज यांना दोन मुली देखील आहे. सांगायचं झालं तर, मुमताज गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहेत. पण काही महिन्यांपूर्वी त्यांनी पुन्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची इच्छा व्यक्त केली. पण त्यांनी आईच्या भूमिका साकारण्यास स्पष्ट नकार दिला.
Leave a Reply